शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पावसाळ्यातील निवडणुकांना भाजपचा विरोध; सोमवारी घेणार निवडणूक आयोगाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 19:55 IST

Nagpur News राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी घेण्याची घोषणा केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी भाजपने पुढे येत याला विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देसरकारशी चर्चा न करता घेतला निर्णय

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी घेण्याची घोषणा केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी भाजपने पुढे येत याला विरोध दर्शविला आहे.

सध्याची पावसाची परिस्थती बघता निवडणुका आता घेतल्या तर ८० टक्के मतदार हा मतदान केंद्रावर जाऊच शकणार नाही. त्यामुळे या निवडणुका पुढे सप्टेंबरपर्यंत ढकलण्याच्या मागणीसाठी सोमवार, ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात राज्यभरातील भाजप नेते निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहेत.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत म्हणाले, ऐन पावसाळ्यात निवडणुका घेणे हा एककल्ली निर्णय आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारशी चर्चा न करता हा निर्णय घेतला आहे. आयोगाने अतिवृष्टी, पूर परिस्थिती, ढगफुटी इत्यादी नैसर्गिक संकटांचा विचार न करता ऐन खरीप हंगामात निवडणुका लावल्या आहेत. सर्व शासकीय यंत्रणा निवडणुकांमध्ये व्यस्त झाल्यास नैसर्गिक आपत्ती आल्यास आवश्यक नियोजनाचा प्रश्न उभा राहणार आहे. पूर परिस्थिती, अतिवृष्टी आणि पावसाळ्याचे नियोजन अत्यावश्यक असल्याने या निवडणुका सप्टेंबर २०२२ पर्यंत घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक