शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भाजप-राष्ट्रवादीने नाना पटोलेंचे राजकारण संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:03 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप : भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत सेटिंग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.शुक्रवारी पत्रपरिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, राज्याच्या दृिष्टकोनातून भंडारा-गोंदिया हा महत्त्वाचा मतदार संघ आहे. नाना पटोले यांनी भाजप सोडले तेव्हा त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका, यामुळे जॉर्इंट किलर म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. तेव्हा या लोकसभेच्या मतदारसंघात पटोले हेच निवडणूक लढवतील, असे वाटले होते. म्हणून आम्हीही त्यांना समर्थन जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीकडे ही जागा गेली आणि त्यांनी जाणूनबुजून या ठिकाणी कमजोर उमेदवार दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने या ठिकाणी कमकुवत उमेदवार का दिला, त्याचे कारण जाहीर करण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केले.राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे साटेलोटे जगजाहीर आहे, म्हणून नाना पटोले यांची उमेदवारी नाकारली गेली. त्यानंतर राष्ट्रवादीने ही तिकडे कमजोर उमेदवार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या या वाटाघाटीतून भाजपची सीट निघावी हाच प्रयत्न असल्याचे दिसत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. तसेच या खेळीला काँग्रेस मात्र कशी बळी पडली असा सवालही त्यांनी केला.पत्रपरिषदेत भारिपचे भंडाऱ्यातील उमेदवार एल.के. मडावी, ज्येष्ठ नेते राजू लोखंडे उपस्थित होते.भाजपला वॉकओवर मिळू देणार नाही२०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलू असा भाजपचा अजेंडा आहे. मात्र, भाजपचा हा अजेंडा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे भंडारा-गोेदिया लोकसभा पोटनिवडणूक भाजपासाठी एकतर्फी करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाला वॉकओवर मिळू देणार नाही. त्यामुळेच आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूक