शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाजप-राष्ट्रवादीने नाना पटोलेंचे राजकारण संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:03 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप : भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत सेटिंग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.शुक्रवारी पत्रपरिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, राज्याच्या दृिष्टकोनातून भंडारा-गोंदिया हा महत्त्वाचा मतदार संघ आहे. नाना पटोले यांनी भाजप सोडले तेव्हा त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका, यामुळे जॉर्इंट किलर म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. तेव्हा या लोकसभेच्या मतदारसंघात पटोले हेच निवडणूक लढवतील, असे वाटले होते. म्हणून आम्हीही त्यांना समर्थन जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीकडे ही जागा गेली आणि त्यांनी जाणूनबुजून या ठिकाणी कमजोर उमेदवार दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने या ठिकाणी कमकुवत उमेदवार का दिला, त्याचे कारण जाहीर करण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केले.राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे साटेलोटे जगजाहीर आहे, म्हणून नाना पटोले यांची उमेदवारी नाकारली गेली. त्यानंतर राष्ट्रवादीने ही तिकडे कमजोर उमेदवार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या या वाटाघाटीतून भाजपची सीट निघावी हाच प्रयत्न असल्याचे दिसत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. तसेच या खेळीला काँग्रेस मात्र कशी बळी पडली असा सवालही त्यांनी केला.पत्रपरिषदेत भारिपचे भंडाऱ्यातील उमेदवार एल.के. मडावी, ज्येष्ठ नेते राजू लोखंडे उपस्थित होते.भाजपला वॉकओवर मिळू देणार नाही२०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलू असा भाजपचा अजेंडा आहे. मात्र, भाजपचा हा अजेंडा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे भंडारा-गोेदिया लोकसभा पोटनिवडणूक भाजपासाठी एकतर्फी करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाला वॉकओवर मिळू देणार नाही. त्यामुळेच आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूक