शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविले : युवक काँंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:01 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ एप्रिल रोजी बेरोजगारांचा एल्गार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल राऊत, शहर अध्यक्ष बंटी शेळके, ग्रामीण अध्यक्ष अनिल राय, एनएसयुआयचे अमीर नुरी, जावेद शेख, धीरज पांडे, आदींनी शनिवारी पत्रकार परिषद घेत या एल्गार मोर्चाची घोषणा केली. राऊत म्हणाले, १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे पोहचेल. तेथे जाहीर सभा होईल. मोर्चात पाच ते सहा हजार बेरोजगार युवक, युवतींसह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील. राज्यात १ लाख ७७ हजार शासकीय पदे रिक्त आहेत. याशिवाय बँक, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही नोकरभरती नाही. मोठमोठे मेळावे घेऊन युवकांना मिहानचे स्वप्न दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात नोकºया मिळाल्या नाहीत. यामुळे त्रस्त झालेला बेरोजगार युवक एकत्र येऊन एल्गार मोर्चाच्या माध्यमातून सरकार विरोधात हुंकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या मोर्चासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा बरार, प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते सहभागी होतील, असा दावा बंटी शेळके यांनी केला. आपण स्वत: माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यांना फोन करून निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन