शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भाजपाने युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविले : युवक काँंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:01 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ एप्रिल रोजी बेरोजगारांचा एल्गार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल राऊत, शहर अध्यक्ष बंटी शेळके, ग्रामीण अध्यक्ष अनिल राय, एनएसयुआयचे अमीर नुरी, जावेद शेख, धीरज पांडे, आदींनी शनिवारी पत्रकार परिषद घेत या एल्गार मोर्चाची घोषणा केली. राऊत म्हणाले, १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे पोहचेल. तेथे जाहीर सभा होईल. मोर्चात पाच ते सहा हजार बेरोजगार युवक, युवतींसह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील. राज्यात १ लाख ७७ हजार शासकीय पदे रिक्त आहेत. याशिवाय बँक, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही नोकरभरती नाही. मोठमोठे मेळावे घेऊन युवकांना मिहानचे स्वप्न दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात नोकºया मिळाल्या नाहीत. यामुळे त्रस्त झालेला बेरोजगार युवक एकत्र येऊन एल्गार मोर्चाच्या माध्यमातून सरकार विरोधात हुंकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या मोर्चासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा बरार, प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते सहभागी होतील, असा दावा बंटी शेळके यांनी केला. आपण स्वत: माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यांना फोन करून निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन