शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

भाजपाने युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविले : युवक काँंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:01 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ एप्रिल रोजी बेरोजगारांचा एल्गार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल राऊत, शहर अध्यक्ष बंटी शेळके, ग्रामीण अध्यक्ष अनिल राय, एनएसयुआयचे अमीर नुरी, जावेद शेख, धीरज पांडे, आदींनी शनिवारी पत्रकार परिषद घेत या एल्गार मोर्चाची घोषणा केली. राऊत म्हणाले, १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे पोहचेल. तेथे जाहीर सभा होईल. मोर्चात पाच ते सहा हजार बेरोजगार युवक, युवतींसह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील. राज्यात १ लाख ७७ हजार शासकीय पदे रिक्त आहेत. याशिवाय बँक, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही नोकरभरती नाही. मोठमोठे मेळावे घेऊन युवकांना मिहानचे स्वप्न दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात नोकºया मिळाल्या नाहीत. यामुळे त्रस्त झालेला बेरोजगार युवक एकत्र येऊन एल्गार मोर्चाच्या माध्यमातून सरकार विरोधात हुंकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या मोर्चासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा बरार, प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते सहभागी होतील, असा दावा बंटी शेळके यांनी केला. आपण स्वत: माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यांना फोन करून निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन