शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपा सरकार विसरले आश्वासनांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 01:09 IST

भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी हलबा, हलबी आदिवासींना न्याय देणारा जीआर काढू. हलबा समाजाला वैधतेचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. असा आरोप काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते यांनी केला.

ठळक मुद्देहलबा समाजाच्या न्यायासाठी काँग्रेसचे धरणे

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी हलबा, हलबी आदिवासींना न्याय देणारा जीआर काढू. हलबा समाजाला वैधतेचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. असा आरोप काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते यांनी केला. 

काँग्रेसतर्फे हलबा समाजाच्या न्याय मागण्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. नंदा पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, डॉ. अमोल देशमुख, माजी नगरसेवक रमण पैगवार, आयकर विभागाचे माजी आयुक्त धनंजय धार्मिक, किशोर जिचकार, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुसैन, गीता जळगावकर, राजेंद्र नंदनकर, गोलू सदावर्ती, राधेश्याम बारापात्रे, कल्पना अडमकर, महेश श्रीवास्तव, हरेंद्र शाहू, सचिन मेश्राम, दमयंती बावने, बाळकृष्ण वट्टेवार, अभिषेक मोहाडीकर यांच्यासह मोठ्या संख्येने हलबा समाज बांधव सहभागी झाले होते. धरण्यावर बसलेल्या हलबा बांधवांनी हातात फलक घेऊन, जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना नंदा पराते म्हणाल्या की, काँग्रेसने सत्तेवर असताना वैधता प्रमाणपत्राच्या नावावर अन्याय होणाऱ्या आदिवासींना संरक्षण दिले होते. पण भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने दिलेले संरक्षण काढून टाकले. उच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणाविरोधात भाजपाने सुप्रीम कोर्टात जाऊन अन्यायग्रस्त आदिवासींचे संरक्षण काढले. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात कबूल केले की डिसेंबर २०१९ पर्यंत अन्यायग्रस्त आदिवासींना नोकरीवरून काढून टाकू. भाजप सरकारने हलबा, माना, धनगर, हलबी, गोवारी, धोबा, मन्नेवार, छत्री ठाकरू, अशा ३३ अन्यायग्रस्त आदिवासींच्या पोटावर लाथ मारली आहे. त्यामुळे समाजाने आपल्या अन्यायाच्या विरोधात भाजपाला धडा शिकविण्याचे आवाहन पराते यांनी केले.

टॅग्स :Halba Communityहलबा समाजagitationआंदोलन