शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपुरात भाजपचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते खोळंबले; रेल्वेगाडी दुपारी २ ला निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:04 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापनदिन सोहळ्याला जाण्यासाठी खास ठरविलेल्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत भाजप व रेल्वे प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संभ्रमाचा फटका आज येथील अजनी स्थानकावर जमा झालेल्या दीड दोन हजार कार्यकर्त्यांना बसला.

ठळक मुद्देसमन्वयाचा अभाव नडलापाच-सहा तासांची कंटाळवाणी प्रतिक्षा

 

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर:  

गाडीची निर्धारित वेळ दहाची असल्याचे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले असताना ही गाडी सकाळी सव्वा आठलाच रवाना झाली.  कार्यकर्त्यांसाठी गाडीची सोय करून ती निघेपर्यंतचा पाच सहा तासांचा काळ या कार्यकर्त्यांना अजनीच्या लहानशा रेल्वेफलाटावरच जिथे जागा मिळेल तिथे बसून काढावा लागतो आहे. यात महिला कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.मुंबईच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रभागातून किमान १००० कार्यकर्ते आणावेत अशी सूचना दिली गेली असल्याने नागपुरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे निघण्यास सज्ज झाले होते. मात्र गाडीच्या वेळेतील घोटाळ््यामुळे त्यांना गुरुवारचा अर्धा दिवस अजनीच्या रेल्वे फलाटावरच तिष्ठत बसून काढावा लागतो आहे. यातील काहींनी घरून आणलेले डबे सोडून जेवणे सुरू केली तर काहींनी जवळपासच्या लहानशा हॉटेल्सचा पेटपुजेसाठी आश्रय घेतला. यात काही कार्यकर्ते नागपूरच्या ग्रामीण भागातूनही आलेले आहेत. त्यांचेही यात हाल होत आहेत.

 समन्वयाच्या अभावाने अशी झाली गडबड... 

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते.   

 

टॅग्स :BJPभाजपा