शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नागपुरात भाजपचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते खोळंबले; रेल्वेगाडी दुपारी २ ला निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:04 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापनदिन सोहळ्याला जाण्यासाठी खास ठरविलेल्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत भाजप व रेल्वे प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संभ्रमाचा फटका आज येथील अजनी स्थानकावर जमा झालेल्या दीड दोन हजार कार्यकर्त्यांना बसला.

ठळक मुद्देसमन्वयाचा अभाव नडलापाच-सहा तासांची कंटाळवाणी प्रतिक्षा

 

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर:  

गाडीची निर्धारित वेळ दहाची असल्याचे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले असताना ही गाडी सकाळी सव्वा आठलाच रवाना झाली.  कार्यकर्त्यांसाठी गाडीची सोय करून ती निघेपर्यंतचा पाच सहा तासांचा काळ या कार्यकर्त्यांना अजनीच्या लहानशा रेल्वेफलाटावरच जिथे जागा मिळेल तिथे बसून काढावा लागतो आहे. यात महिला कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.मुंबईच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रभागातून किमान १००० कार्यकर्ते आणावेत अशी सूचना दिली गेली असल्याने नागपुरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे निघण्यास सज्ज झाले होते. मात्र गाडीच्या वेळेतील घोटाळ््यामुळे त्यांना गुरुवारचा अर्धा दिवस अजनीच्या रेल्वे फलाटावरच तिष्ठत बसून काढावा लागतो आहे. यातील काहींनी घरून आणलेले डबे सोडून जेवणे सुरू केली तर काहींनी जवळपासच्या लहानशा हॉटेल्सचा पेटपुजेसाठी आश्रय घेतला. यात काही कार्यकर्ते नागपूरच्या ग्रामीण भागातूनही आलेले आहेत. त्यांचेही यात हाल होत आहेत.

 समन्वयाच्या अभावाने अशी झाली गडबड... 

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते.   

 

टॅग्स :BJPभाजपा