शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:43 IST

भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. या वेळीही या विषयावर ते काहीच बोलले नसल्याने विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.२४ ऑक्टोबरच्या निकालानंतर विदर्भ आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून विदर्भातील जनतेने भाजपाचे ४४ आमदार निवडून दिले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता बसली. १२३ आमदारांपैकी ४४ आमदारांचा मोठा गट विदभार्तून निवडून जाऊनही या आमदारांनी विदर्भाबद्दल कोणतीही भूमिका घेतली नाही. सत्ता मिळताच भाजपाने विदर्भातील जनतेला धोका दिला. विदर्भ राज्याची निर्मिती केली नाही. विदर्भाच्या प्रश्नासोबतच शेतकरी, बेरोजगार, आर्थिक मंदी या प्रश्नावरसुद्धा भाजपाने लक्ष दिले नाही, त्याचाच हा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या पाच वर्षभर भाजपविरोधात वातावरण तयार केले. २०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातील जनता भाजपला विदर्भातून हद्दपार करेल, असे प्रत्येक वेळी ठणकावून सांगितले होते. या जनजागृतीचा हा परिणाम असून भाजपाच्या १५ जागा विदभार्तून कमी करण्यासाठी मात्र विदर्भाचा मुद्दाच कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाने या निकालापासून धडा घ्यावा. विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vidarbhaविदर्भBJPभाजपा