शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:43 IST

भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. या वेळीही या विषयावर ते काहीच बोलले नसल्याने विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.२४ ऑक्टोबरच्या निकालानंतर विदर्भ आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून विदर्भातील जनतेने भाजपाचे ४४ आमदार निवडून दिले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता बसली. १२३ आमदारांपैकी ४४ आमदारांचा मोठा गट विदभार्तून निवडून जाऊनही या आमदारांनी विदर्भाबद्दल कोणतीही भूमिका घेतली नाही. सत्ता मिळताच भाजपाने विदर्भातील जनतेला धोका दिला. विदर्भ राज्याची निर्मिती केली नाही. विदर्भाच्या प्रश्नासोबतच शेतकरी, बेरोजगार, आर्थिक मंदी या प्रश्नावरसुद्धा भाजपाने लक्ष दिले नाही, त्याचाच हा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या पाच वर्षभर भाजपविरोधात वातावरण तयार केले. २०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातील जनता भाजपला विदर्भातून हद्दपार करेल, असे प्रत्येक वेळी ठणकावून सांगितले होते. या जनजागृतीचा हा परिणाम असून भाजपाच्या १५ जागा विदभार्तून कमी करण्यासाठी मात्र विदर्भाचा मुद्दाच कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाने या निकालापासून धडा घ्यावा. विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vidarbhaविदर्भBJPभाजपा