शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भाजपा, काँग्रेस विरुद्ध लढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:40 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत आलेली भाजपा २०१९ मध्ये विदर्भ राज्य देईल, या स्वप्नात राहू नका. भाजपा विदर्भ राज्य देणार नाही.

ठळक मुद्देश्रीहरी अणे : राजकीय शक्ती निर्माण करावी लागेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत आलेली भाजपा २०१९ मध्ये विदर्भ राज्य देईल, या स्वप्नात राहू नका. भाजपा विदर्भ राज्य देणार नाही. कारण काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही विदर्भ व एकूणच नवीन राज्य निर्माण करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांसह देशातील सर्वच नवीन राज्याची मागणी करणाºयांनी स्वत:ची स्थानिक स्तरावर राजकीय शक्ती निर्माण करण्याची गरज आहे. काँग्रेस आणि भाजपाविरुद्ध थेट निवडणूक लढण्याची गरज आहे. राजकीय पक्षांमध्ये विश्वसनीय पर्यायी भीती निर्माण होत नाही तोपर्यंत दिल्लीत सत्तेवर असलेल्यांवर दबाव निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक आणि नवराज्य निर्माण महासंघाचे अध्यक्ष माजी महाधिवक्ता अ‍ॅड श्रीहरी अणे यांनी येथे केलेविदर्भ राज्य आघाडीतर्फे नॅशनल फेडरेशन आॅफ न्यू स्टेट्स (नवराज्य निर्माण महासंघाचे) पहिले राष्ट्रीय अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नवराज्य निर्माण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष राजा बुंदेला हे प्रमुख अतिथी होते. तसेच पूर्वांचल अ‍ॅक्शन ग्रुपचे पंकज कुमार जायस्वाल, आॅल बोडो स्टुडंट युनियनचे अध्यक्ष प्रमोद बोरो, कुसुम स्वर्गीयाशी, लॉरेन्स इशाराशी, पीपल्स जॉर्इंट अ‍ॅक्शन कमेटी फॉर बोडोलॅण्ड मुव्हमेंटचे मुख्य संयोजक राकेश बोरो, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (प्रोग्रेसिव्ह) धीरेन बोरो, कुकीलॅण्ड स्टेट डिमांड कमेटीचे शेबोई हाऊकीप, के हाऊको गांगटे, कार्बी आँगलॉन पॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर आॅटोनोमस स्टेटचे स्टॅलेन एंगटी आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचे प्रमोद काडुंभरी प्रमुख पाहुणे होते.अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले, गडकरी आणि फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची एक मर्यादा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेच देश चालवित आहेत. त्यामुळे या दोघांनी ठरविले तरच स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ शकते. हे दोघे तेव्हाच ऐकतील जेव्हा आपण आपली राजकीय शक्ती निर्माण करू. त्यासाठी भाजपा-काँग्रेस सोडून देशातील इतर राजकीय पक्षांची व नेत्यांची मदत घेऊन दबाव निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांच्यासह बोडोलँड, बुंदेलखंड, गोरखालॅँड, कुकीलँड, पूर्वांचल, टिष्ट्वपरललँड आदींच्या प्रतिनिधींनी त्यांच्या राज्यातील भीषण परिस्थिती विशद करीत स्वतंत्र राज्याची आवश्यकता स्पष्ट केली. अ‍ॅड. रवी सन्याल यांनी भूमिका विशद केली.रक्ताने नव्हे कायद्यानेच राज्य मिळेलरक्त सांडवून आंदोलन केल्यामुळेच मागणी पूर्ण होत नाही. सरकार हे अहिंसेला घाबरते. हिंसेला ते आटोक्यात आणू शकते. याचे उदाहरण महात्मा गांधीजींनीच घालून दिले आहे. त्यामुळे नवीन राज्याची मागणी करण्यासाठी आंदोलन होईल, परंतु ते सनदशीर मार्गाने. रक्तरंजित आंदोलन होणार नाही, असेही अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान मोदी भेटतच नाहीतस्वतंत्र विदर्भ राज्यासह देशातील विविध भागात सुरू असलेल्या स्वतंत्र राज्य मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ माागितला आहे. परंतु ते भेटायलाच तयार नाहीत. या अधिवेशनात पारित झालेले ठराव घेऊन पुन्हा २६ व २७ आॅक्टोबरला त्यांना व गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. वेळ मिळाला तर त्यांना निवेदन देऊन चर्चा करू, असेही अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले.