शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

नागपूर जिल्ह्यातील काटोलवर सेनेचा दावा, भाजपनेही थोेपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 11:21 IST

विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या अस्तिवाची लढाईशेकापला हवी आघाडीत जागा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे. मात्र आघाडीत ही शेकापला सोडण्यात यावी, अशी मागणी पुढे आल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काटोलमध्ये सेनेला २२ हजार २०३ मतांची लीड मिळाली. युतीची ताकद वाढली. पारंपरिक जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात आहे. युतीच्या विजयात दोन्ही पक्षाचा वाटा असल्याने येथे विधानसभेसाठी भाजप-सेनेने दावा केला आहे.२०१४ मध्ये येथे चौरंगी लढतीत भाजपचे आशिष देशमुख यांनी विजय मिळविला. सेनेच्या पारंपरिक मतदार संघ आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने बाजी मारली. २०१८ मध्ये देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम केला. मात्र देशमुख यांचा विजय भाजपाचा होता. या मतदार संघात भाजपाचे पक्षसंघटन मजबूत असल्याने युतीत ही जागा भाजपसाठी सोडण्यात यावी, असा युक्तिवाद भाजपाचे नेते करीत आहेत. विधानसभा लढण्याच्या दृष्टीने येथे भाजपाने तयारी चालविली आहे. भाजपकडून येथे विधानसभा प्रमुख आणि काटोल नगर परिषदेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर प्रबळ दावेदार आहेत. मात्र देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर अविनाश ठाकरे या मतदारसंघात सक्रिय झाले. गत वर्षभरात येथे पक्षसंघटन बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठविली. त्यामुळे ठाकरेही काटोलसाठी इच्छुक आहेत.विधानसभेपूर्वी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर काटोल पंचायत समितीचे माजी सभापती संदीप सरोदे यांचाही काटोलसाठी दावा असणार आहे. जागा वाटपात काटोलची जागा सेनेच्याच वाट्याला येणार असे स्पष्ट करीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र हरणे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००४ च्या निवडणुकीत सेनेकडून लढणारे सतीश शिंदे यांच्यावेळी कुणासोबत राहणार याकडे लक्ष लागले आहे. इकडे आघाडीत काटोलची जागा शेकापसाठी सोडण्यात यावी अशी गुगली राहुल देशमुख यांनी टाकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे. कॉँग्रेस मात्र येथे आघाडी धर्म पाळण्याच्या भूमिकेत आहे.कुणबी, तेली आणि दलित मतदारावर भिस्त असलेल्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीचाही डोळा आहे. राष्ट्रवादीला टक्कर देणाºयाला येथे वंचितची उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

आशिष देशमुख कुणासोबत?काका अनिल देशमुख यांचा पराभव करणारे आशिष देशमुख आज कॉँग्रेसमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यासाठी काटोल-नरखेडमध्ये मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते आघाडी धर्म पाळतील का याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक