शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूर जिल्ह्यातील काटोलवर सेनेचा दावा, भाजपनेही थोेपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 11:21 IST

विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या अस्तिवाची लढाईशेकापला हवी आघाडीत जागा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या काटोल मतदार संघात जागा वाटपावरुन भाजप-सेना नेतृत्वाचा कस लागणार आहे. इकडे गेलेला मतदार परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी कंबर कसली आहे. मात्र आघाडीत ही शेकापला सोडण्यात यावी, अशी मागणी पुढे आल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काटोलमध्ये सेनेला २२ हजार २०३ मतांची लीड मिळाली. युतीची ताकद वाढली. पारंपरिक जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात आहे. युतीच्या विजयात दोन्ही पक्षाचा वाटा असल्याने येथे विधानसभेसाठी भाजप-सेनेने दावा केला आहे.२०१४ मध्ये येथे चौरंगी लढतीत भाजपचे आशिष देशमुख यांनी विजय मिळविला. सेनेच्या पारंपरिक मतदार संघ आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने बाजी मारली. २०१८ मध्ये देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम केला. मात्र देशमुख यांचा विजय भाजपाचा होता. या मतदार संघात भाजपाचे पक्षसंघटन मजबूत असल्याने युतीत ही जागा भाजपसाठी सोडण्यात यावी, असा युक्तिवाद भाजपाचे नेते करीत आहेत. विधानसभा लढण्याच्या दृष्टीने येथे भाजपाने तयारी चालविली आहे. भाजपकडून येथे विधानसभा प्रमुख आणि काटोल नगर परिषदेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर प्रबळ दावेदार आहेत. मात्र देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर अविनाश ठाकरे या मतदारसंघात सक्रिय झाले. गत वर्षभरात येथे पक्षसंघटन बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठविली. त्यामुळे ठाकरेही काटोलसाठी इच्छुक आहेत.विधानसभेपूर्वी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तर काटोल पंचायत समितीचे माजी सभापती संदीप सरोदे यांचाही काटोलसाठी दावा असणार आहे. जागा वाटपात काटोलची जागा सेनेच्याच वाट्याला येणार असे स्पष्ट करीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र हरणे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००४ च्या निवडणुकीत सेनेकडून लढणारे सतीश शिंदे यांच्यावेळी कुणासोबत राहणार याकडे लक्ष लागले आहे. इकडे आघाडीत काटोलची जागा शेकापसाठी सोडण्यात यावी अशी गुगली राहुल देशमुख यांनी टाकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे. कॉँग्रेस मात्र येथे आघाडी धर्म पाळण्याच्या भूमिकेत आहे.कुणबी, तेली आणि दलित मतदारावर भिस्त असलेल्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीचाही डोळा आहे. राष्ट्रवादीला टक्कर देणाºयाला येथे वंचितची उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

आशिष देशमुख कुणासोबत?काका अनिल देशमुख यांचा पराभव करणारे आशिष देशमुख आज कॉँग्रेसमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यासाठी काटोल-नरखेडमध्ये मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते आघाडी धर्म पाळतील का याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक