शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सीएएविरोधातील आंदोलनात भाजपाकडून निर्दयपणे दडपशाही : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 20:55 IST

: ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.चव्हाण म्हणाले, सीएएला असलेला विरोध शांततामय मार्गाने प्रदर्शित करावा, असे आपले जनतेला आवाहन आहे. महाराष्ट्रात शांतपणे विरोध दर्शविला जात आहे. पोलीसही ही परिस्थिती येथे उत्तमपणे हाताळत आहेत. हा कायदा घटनाविरोधी असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र सरकार हा लागू करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे राज्य सरकारची या संदर्भात भूमिका स्पष्ट आहे.ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे, तिथेच ही आंदोलने अधिक तीव्रपणे पेटली आहेत. हे वातावरण योग्य परिस्थिती हाताळून शांत करण्याची गरज असताना केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन हाताळत आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हट्टाने हा कायदा देशात लागू करू पहात आहे. यामुळे धर्मनिरपेक्षता बाजूला पडून एका धर्माचे प्राबल्य वाढविण्याचा आणि अल्पसंख्यकांना डावलण्याचा त्यांचा डाव यामागे दिसत आहे. धर्म हा कोणत्याही देशाचा आधार होऊ शकत नाही. असे असतानाही राष्ट्रीया स्वयंसेवक संघाचा अजेंडा धर्माचे प्राबल्य वाढविणे हाच आहे. तोच अजेंडा भाजपा सरकार चालवित आहे. यामुळेच देशात संघर्षाची परिस्थिती उद्भवली आहे.भारतामध्ये सुरू असलेल्या या घडामोडीकडे युरोपियन देशांचे लक्ष असून तेथील राजदूतांनी त्या संदर्भातील अहवालही संबंधित राष्ट्रांना पाठविला आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या भारताची प्रतिमा आंतराष्ट्रीय पातळीवर मलिन होत असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा