शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

नागपुरातील पाणी पॅकेजिंग कंपनीवर बीआयएसची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:11 IST

नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे.

ठळक मुद्देबालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेसवर कारवाई अवैध आयएसआय मार्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनीमध्ये २० लिटर पाण्याच्या कॅनवर अवैधरीत्या आयएसआय मार्क चिन्हांकित करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. माहितीच्या आधारे भारतीय मानक ब्युरोच्या नागपूर शाखेचे प्रमुख आर.पी. मिश्रा यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कंपनीवर धाड टाकली.कारवाईत कंपनीच्या गोदामातून बॅली बॅ्रडची ३५ आणि ब्ल्यू किंग ब्रॅण्डचे २० लिटरचे १३८ कॅन तसेच १७३ बॉटल जप्त केल्या. या सर्व पॅकिंगवर कंपनीच्या संचालकांनी भारतीय मानक ब्युरोकडून परवाना न घेता अवैधरीत्या आयएसआय मार्कचा उपयोग करण्यात येत होता.बॅली ब्रॅण्डच्या ३५ कॅनवर पॅकेजिंग कंपनी श्री बालाजी फूड अ‍ॅण्ड ब्रेव्हरेजेस कंपनी (शंकरपूर) अशी नोंद करण्यात आली होती. तर ब्लू किंग ब्रॅण्डच्या १३८ कॅनवर सनशाईन ब्रेव्हरेजेस (नरेंद्रनगर) आणि येरने अ‍ॅग्रो इंड्रस्टीज (जसपूर-नागपूर) यांच्यातर्फे पॅकेजिंग करण्यात आल्याची नोंद केली होती.या प्रकारे विनापरवाना अवैधरित्या पॅकेज पाण्याचे कॅन वा बॉटलवर आयएसआय मार्क लावून विक्री करणे गैरकायदेशीर आहे.

समारंभात मिळणारे पाणी अशुद्धच!ब्युरोच्या सूत्रानुसार लग्नसमारंभ वा अन्य कार्यक्रमात कॅनमध्ये लोकांना देण्यात येणारे पाणी नियमानुसार आयएसआय मार्कचे नसते. ते पाणी अशुद्धच आहे. कॅनमधील पाणी केवळ एक दिवसासाठी पिण्यायोग्य असते. पण लोक या पाण्याला शुद्ध पाणी समजतात. हे चुकीचे आहे.

पॅकिंगवर आयएसआय मार्क आवश्यकभारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनुसार कोणत्याही पारदर्शक पाण्याच्या बॉटलवर आयएसआय मार्क असणे आवश्यक आहे. ब्युरोकडून परवाना प्राप्त करणारी कंपनीच पॅकिंग पाण्याच्या बॉटलवर उपरोक्त ट्रेडमार्कचा उपयोग करू शकते. मान्यताप्राप्त कंपनीच्या बॉटलचे पाणी ३० दिवसांपर्यंत पिण्यायोग असते. अशा स्थितीत काही कंपन्या अवैधरीत्या पॅकिंग पाण्याच्या बॉटलवर आयएसआय मार्कचा उपयोग करून ग्राहक आणि ब्युरोची फसवणूक करीत आहे.

टॅग्स :raidधाड