शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील बिर्याणी तापली, आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

By नरेश डोंगरे | Updated: April 29, 2024 21:06 IST

फुड पॉइजिंग झालेच कसे : विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश

नागपूर: रेल्वेतील अंडा बिर्याणीतून झालेल्या विषबाधा प्रकरणाने मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, आज येथील शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली असून, त्यांना या संबंधाने विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

शुक्रवारी सकाळी यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या कॅटरिंगमधून पुरिवण्यात आलेली अंडा बिर्याणी खाल्ली अशा ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. ईटारसीजवळ प्रवाशांना पोटदुखी, मळमळ, ओकाऱ्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यानंतर कानपूर, झांसीमधून प्रवाशांवर उपचार सुरू झाले. दरम्यान, प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ दिल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात असताना या दाव्याची अशा पद्धतीने वाट लागल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जावी, अशीही मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी आज आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या कार्यालयात बोलवून त्याची चांगलीच झाडाझडती घेतल्याची चर्चा आहे. या गंभीर प्रकरणात कुणाची चूक आहे, त्यासंबंधीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.ठिकठिकाणच्या स्टॉलची तपासणीअशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागपूर विभागात येणाऱ्या अनेक रेल्वे स्थानकावरच्या फूड किचनमध्ये तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. नागपूर, बल्लारशाह, वर्धा, सेवाग्राम, आमला, बैतूलसह ठिकठिकाणच्या किचनमधून खाद्यपदार्थ कशा पद्धतीने तयार केले जातात, तेथील स्वच्छतेची स्थिती काय आहे, हे तपासण्यासोबतच तेथील विविध खाद्य पदार्थांचे नमूनेही घेण्यात आले आहे. हे नमूने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.-----------------कंत्राटदारावर कारवाई कराकेवळ तपासणी आणि नमूने जप्तीवर न थांबता प्रशासनाने जनआहारचे स्टॉलच्या (कॅटरिंग) कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, त्याचे कंत्राट रद्द करून कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी दिली आहे. या प्रकरणात रेल्वे यात्री परिषदेच्या अध्यक्षांनी रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतल्याचे समजते. जनआहारचे कंत्राट भदोरिया नामक कंत्राटदाराकडे असल्याची माहिती आहे.

टॅग्स :nagpurनागपूर