शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गर्भाच्या ‘जेनेटिक एडिटिंग’ने सुदृढ बालकाचा जन्म शक्य - संशाेधक स्मिता पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:58 IST

मानवी अस्तित्वासाठी ‘जीएम’शिवाय पर्याय नाही

निशांत वानखेडे

नागपूर : सुदृढ बालक जन्माला येणे ही आनंदाची गाेष्ट आहे व म्हणूनच ताे प्रत्येक पालकाचा अधिकारही आहे. जन्माला आल्यानंतर त्याचा आजार किंवा दाेष दूर करणे अडचणीचे असते; पण गर्भात असताना ताे दूर करणे ‘जेनेटिक इंजिनीअरिंग’ तंत्रज्ञानाने शक्य आहे. गर्भाच्या पहिल्या काही आठवड्यात ‘जेनेटिक एडिटिंग’द्वारे दाेषपूर्ण जीन्स काढून आजाररहित बालक जन्माला येणे शक्य आहे. आज नैतिक-अनैतिक या चर्चा हाेत असल्या तरी जेनेटिक एडिटिंग ही भविष्याची गरज आहे, असे स्पष्ट मत उस्मानिया विद्यापीठाच्या जेनेटिक इंजिनीअरिंग ॲण्ड बाॅयाेटेक्नालाॅजी विभागाच्या प्राध्यापक डाॅ. स्मिता पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत सहभागी झालेल्या डाॅ. स्मिता यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना या क्षेत्रातील संशाेधनावर प्रकाश टाकला. चीनमध्ये ‘नीना’ आणि ‘लूलू’ या दाेन ‘डीएनए सुधारित’ बालकांना जन्माला घालण्यात आले आहे. या दाेन्ही बालकांच्या डीएनएमधून एचआयव्ही विषाणूच्या निर्मितीस कारणीभूत जनुक काढण्यात आले. अमेरिकेत ‘ब्राकाजीन्स’ वर संशाेधन यशस्वी झाले आहे. हे स्तन कर्कराेगास कारणीभूत ठरणारे जीन्स आहेत. गर्भामध्ये जेनेटिक एडिटिंगने हे जीन्स काढले तर जन्माला येणाऱ्या बाळाला भविष्यात स्तन कर्कराेग हाेण्याचा धाेका राहणार नाही. आज आपल्या देशात गर्भाच्या जनुकीय सुधारणेला मान्यता नसली तरी भविष्यात हे तंत्रज्ञान सुदृढ बालकांच्या जन्मासाठी निर्णायक ठरेल, असा आशावाद डाॅ. स्मिता यांनी व्यक्त केला.

‘जीई’मुळेच काेराेनाची लस शक्य झाली

जेनेटिक इंजिनीअरिंगमुळेच एका वर्षात काेराेनाविरुद्ध लस तयार करणे शक्य झाले. वेगवेगळ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी जीई तंत्रज्ञान अतिशय लाभदायक ठरणारे आहे. या तंत्रज्ञानाने बाॅयाेवाॅरचा धाेका आहे, पण ते मानवी विकृतीवर अवलंबून आहे. सध्या फायदे अधिक आहेत.

जीएम अन्नाला परवानगी द्यावीच लागेल

भारतात बीटी-काॅटन वगळता काेणत्याच जनुकीय सुधारित (जीएम) वाणाला मान्यता नाही. इतर देशांनी ती दिली आहे. जवळच्या बांगलादेशनेही ती दिली आहे. परदेशातून येणारे अन्न कदाचित जीएम असेल. आपण त्यापासून परावृत्त राहू शकत नाही. काही वर्षांत भारताची लाेकसंख्या चीनलाही मागे टाकेल. तेव्हा अन्नाची गरज भागविण्यासाठी जीएम अन्नाचीच गरज पडेल. मानवी अस्तित्वासाठी जीएम महत्त्वाचे आहेत.

आपण माकडाचे वंशज नाही

जनुकीय समानतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली, हे गृहितक मान्यता पावले आहे. मात्र, नवीन संशाेधनात हे गृहीतक खाेटे ठरत आहे. उलट हजाराे वर्षापूर्वी एप्स माकड व मानवाचे पृथ्वीवर एकाचवेळी अस्तित्व हाेते, असे संशाेधनातून समाेर आले असल्याची माहिती डाॅ. स्मिता पवार यांनी दिली.

टॅग्स :scienceविज्ञानResearchसंशोधन