शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

गर्भाच्या ‘जेनेटिक एडिटिंग’ने सुदृढ बालकाचा जन्म शक्य - संशाेधक स्मिता पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:58 IST

मानवी अस्तित्वासाठी ‘जीएम’शिवाय पर्याय नाही

निशांत वानखेडे

नागपूर : सुदृढ बालक जन्माला येणे ही आनंदाची गाेष्ट आहे व म्हणूनच ताे प्रत्येक पालकाचा अधिकारही आहे. जन्माला आल्यानंतर त्याचा आजार किंवा दाेष दूर करणे अडचणीचे असते; पण गर्भात असताना ताे दूर करणे ‘जेनेटिक इंजिनीअरिंग’ तंत्रज्ञानाने शक्य आहे. गर्भाच्या पहिल्या काही आठवड्यात ‘जेनेटिक एडिटिंग’द्वारे दाेषपूर्ण जीन्स काढून आजाररहित बालक जन्माला येणे शक्य आहे. आज नैतिक-अनैतिक या चर्चा हाेत असल्या तरी जेनेटिक एडिटिंग ही भविष्याची गरज आहे, असे स्पष्ट मत उस्मानिया विद्यापीठाच्या जेनेटिक इंजिनीअरिंग ॲण्ड बाॅयाेटेक्नालाॅजी विभागाच्या प्राध्यापक डाॅ. स्मिता पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत सहभागी झालेल्या डाॅ. स्मिता यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना या क्षेत्रातील संशाेधनावर प्रकाश टाकला. चीनमध्ये ‘नीना’ आणि ‘लूलू’ या दाेन ‘डीएनए सुधारित’ बालकांना जन्माला घालण्यात आले आहे. या दाेन्ही बालकांच्या डीएनएमधून एचआयव्ही विषाणूच्या निर्मितीस कारणीभूत जनुक काढण्यात आले. अमेरिकेत ‘ब्राकाजीन्स’ वर संशाेधन यशस्वी झाले आहे. हे स्तन कर्कराेगास कारणीभूत ठरणारे जीन्स आहेत. गर्भामध्ये जेनेटिक एडिटिंगने हे जीन्स काढले तर जन्माला येणाऱ्या बाळाला भविष्यात स्तन कर्कराेग हाेण्याचा धाेका राहणार नाही. आज आपल्या देशात गर्भाच्या जनुकीय सुधारणेला मान्यता नसली तरी भविष्यात हे तंत्रज्ञान सुदृढ बालकांच्या जन्मासाठी निर्णायक ठरेल, असा आशावाद डाॅ. स्मिता यांनी व्यक्त केला.

‘जीई’मुळेच काेराेनाची लस शक्य झाली

जेनेटिक इंजिनीअरिंगमुळेच एका वर्षात काेराेनाविरुद्ध लस तयार करणे शक्य झाले. वेगवेगळ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी जीई तंत्रज्ञान अतिशय लाभदायक ठरणारे आहे. या तंत्रज्ञानाने बाॅयाेवाॅरचा धाेका आहे, पण ते मानवी विकृतीवर अवलंबून आहे. सध्या फायदे अधिक आहेत.

जीएम अन्नाला परवानगी द्यावीच लागेल

भारतात बीटी-काॅटन वगळता काेणत्याच जनुकीय सुधारित (जीएम) वाणाला मान्यता नाही. इतर देशांनी ती दिली आहे. जवळच्या बांगलादेशनेही ती दिली आहे. परदेशातून येणारे अन्न कदाचित जीएम असेल. आपण त्यापासून परावृत्त राहू शकत नाही. काही वर्षांत भारताची लाेकसंख्या चीनलाही मागे टाकेल. तेव्हा अन्नाची गरज भागविण्यासाठी जीएम अन्नाचीच गरज पडेल. मानवी अस्तित्वासाठी जीएम महत्त्वाचे आहेत.

आपण माकडाचे वंशज नाही

जनुकीय समानतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली, हे गृहितक मान्यता पावले आहे. मात्र, नवीन संशाेधनात हे गृहीतक खाेटे ठरत आहे. उलट हजाराे वर्षापूर्वी एप्स माकड व मानवाचे पृथ्वीवर एकाचवेळी अस्तित्व हाेते, असे संशाेधनातून समाेर आले असल्याची माहिती डाॅ. स्मिता पवार यांनी दिली.

टॅग्स :scienceविज्ञानResearchसंशोधन