शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:37 IST

दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून होणार लागू : अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.रस्ता अपघातात दुचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने १६ मार्च २०१६ रोजी ‘एबीएस’ किंवा ‘सीबीएस’ प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्रालयाकडून दिल्या होत्या. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर काही राज्यात ही प्रणाली राबविण्यात आली. आता १ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ही प्रणाली बसविणे अनिवार्य होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, वाहन डीलर्सला २०२० पर्यंत जुन्या ब्रेक प्रणालीची सर्व वाहने विक्रीस काढावी लागणार आहे.काय आहे ‘एबीएस’ प्रणालीजुन्या वाहनांमध्ये असलेला ब्रेक दाबल्यास चाक ‘लॉक’ होऊन वाहन घसरण्याची भीती असते. परंतु ‘एबीएस’मुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. रस्ता ओला असेल किंवा घसरण्याची शक्यता अधिक असेल किंवा गाडी उलटल्यास या यंत्रणेमुळे अपघात टाळणे शक्य होते. १२५सीसी इंजिनवरील नव्या वाहनांना ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे.अशी आहे ‘सीबीएस’ प्रणालीअनेक वाहन चालक आपल्या अनुभवानुसार दुचाकीला ब्रेक लावताना मागील व पुढील ब्रेक एकाचवेळी दाबतात. यामुळे गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. परंतु प्रत्येकाला असा ब्रेक लावणे शक्य होत नाही. यासाठी ‘कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टीम’ आली आहे. ही प्रणाली लावल्यावर पुढील व मागील चाकावरील दाब समान करीत असल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता कमी होते. ही यंत्रणा १०० ते १२५ सीसी इंजिनच्या सर्व नव्या दुचाकी वाहनांसाठी सक्तीची करण्यात आली आहे.उत्पादित दुचाकींसाठी अनिवार्य१ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ‘सीबीएस’ किंवा ‘एबीएस’ प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीलर्सला ३१ मार्च २०२० पर्यंत जुन्या ब्रेकची दुचाकी वाहने विक्रीस काढावी लागणार आहेत.उमेश पाटणीसदस्य, विदर्भ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन

टॅग्स :bikeबाईकRto officeआरटीओ ऑफीस