शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:37 IST

दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून होणार लागू : अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.रस्ता अपघातात दुचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने १६ मार्च २०१६ रोजी ‘एबीएस’ किंवा ‘सीबीएस’ प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्रालयाकडून दिल्या होत्या. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर काही राज्यात ही प्रणाली राबविण्यात आली. आता १ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ही प्रणाली बसविणे अनिवार्य होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, वाहन डीलर्सला २०२० पर्यंत जुन्या ब्रेक प्रणालीची सर्व वाहने विक्रीस काढावी लागणार आहे.काय आहे ‘एबीएस’ प्रणालीजुन्या वाहनांमध्ये असलेला ब्रेक दाबल्यास चाक ‘लॉक’ होऊन वाहन घसरण्याची भीती असते. परंतु ‘एबीएस’मुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. रस्ता ओला असेल किंवा घसरण्याची शक्यता अधिक असेल किंवा गाडी उलटल्यास या यंत्रणेमुळे अपघात टाळणे शक्य होते. १२५सीसी इंजिनवरील नव्या वाहनांना ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे.अशी आहे ‘सीबीएस’ प्रणालीअनेक वाहन चालक आपल्या अनुभवानुसार दुचाकीला ब्रेक लावताना मागील व पुढील ब्रेक एकाचवेळी दाबतात. यामुळे गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. परंतु प्रत्येकाला असा ब्रेक लावणे शक्य होत नाही. यासाठी ‘कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टीम’ आली आहे. ही प्रणाली लावल्यावर पुढील व मागील चाकावरील दाब समान करीत असल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता कमी होते. ही यंत्रणा १०० ते १२५ सीसी इंजिनच्या सर्व नव्या दुचाकी वाहनांसाठी सक्तीची करण्यात आली आहे.उत्पादित दुचाकींसाठी अनिवार्य१ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ‘सीबीएस’ किंवा ‘एबीएस’ प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीलर्सला ३१ मार्च २०२० पर्यंत जुन्या ब्रेकची दुचाकी वाहने विक्रीस काढावी लागणार आहेत.उमेश पाटणीसदस्य, विदर्भ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन

टॅग्स :bikeबाईकRto officeआरटीओ ऑफीस