शहरं
Join us  
Trending Stories
1
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
3
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
4
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
5
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
6
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
7
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
8
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
9
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
10
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
11
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
12
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
13
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
14
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
15
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
16
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
17
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
18
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
19
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
20
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘धर्मरहस्य’ ग्रंथ सादर करून भाऊजींनी धर्माला शिस्त दिली  : भारती सुदामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:36 IST

भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आकाराला आला.

ठळक मुद्दे भाऊजी दप्तरी यांची जयंती विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आकाराला आला. या ग्रंथाने धर्माला नवी शिस्त प्रदान केली, असे विश्लेषण डॉ. भारती सुदामे यांनी केले.विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासतर्फे भाऊजी दप्तरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त भाऊजींच्या ‘धर्मरहस्य’ ग्रंथावर चर्चेचे आयोजन केले होते. त्यात सुदामे यांनी आपले आकलन मांडले.या ग्रंथाचा अभ्यास करण्याचे प्रयोजन काय? या ग्रंथाच्या विचारातून हाती काय गवसलं आणि गवसलं त्याचा उपयोग सद्यस्थितीत कसा आणि काय होईल? अशी तीन प्रश्ने भाऊजींनी या ग्रंथातून उपस्थित केली आहेत. बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर पुराणमतवादी आणि नवमतवादी असे गट पडले होते. भाऊजी नवमतवादी गटातले. हा ग्रंथ सत्य, सनातन धर्म, समन्वयात्मक जुन्या-नव्या मतांचा सुवर्णमध्य साधणारा आणि सर्वधर्म एकाच पद्धतीने निर्माण झाले आहेत, हे ठासून सांगणारा आहे. हा ग्रंथ वेदांतासंबंधी आमूलाग्र नवीन दृष्टिकोन मांडणारा ठरला आणि त्यांची मते खोडून काढणे कुणालाच शक्य झाले. त्यातून धर्मनिर्णय मंडळाची निर्मिती झाल्याचे सुदामे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र डोळके यांनीही भाष्य केले. परिचय डॉ. विलास देशपांडे यांनी करवून दिला. डॉ. विलास देशपांडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत दिलीप म्हैसाळकर यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, भाऊजी दप्तरी ट्रस्टचे राम दप्तरी, सुरेखा बापट, प्रतिमा आकरे, अपर्णा प्रभुणे, अरुण खोडे, प्रमोद कुलकर्णी, स्नेहल आगाशे, जयंत सुदामे, रेवती कुळकर्णी उपस्थित होते. संचालन प्रा. विवेक अलोणी यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर