शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

‘धर्मरहस्य’ ग्रंथ सादर करून भाऊजींनी धर्माला शिस्त दिली  : भारती सुदामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:36 IST

भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आकाराला आला.

ठळक मुद्दे भाऊजी दप्तरी यांची जयंती विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आकाराला आला. या ग्रंथाने धर्माला नवी शिस्त प्रदान केली, असे विश्लेषण डॉ. भारती सुदामे यांनी केले.विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासतर्फे भाऊजी दप्तरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त भाऊजींच्या ‘धर्मरहस्य’ ग्रंथावर चर्चेचे आयोजन केले होते. त्यात सुदामे यांनी आपले आकलन मांडले.या ग्रंथाचा अभ्यास करण्याचे प्रयोजन काय? या ग्रंथाच्या विचारातून हाती काय गवसलं आणि गवसलं त्याचा उपयोग सद्यस्थितीत कसा आणि काय होईल? अशी तीन प्रश्ने भाऊजींनी या ग्रंथातून उपस्थित केली आहेत. बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर पुराणमतवादी आणि नवमतवादी असे गट पडले होते. भाऊजी नवमतवादी गटातले. हा ग्रंथ सत्य, सनातन धर्म, समन्वयात्मक जुन्या-नव्या मतांचा सुवर्णमध्य साधणारा आणि सर्वधर्म एकाच पद्धतीने निर्माण झाले आहेत, हे ठासून सांगणारा आहे. हा ग्रंथ वेदांतासंबंधी आमूलाग्र नवीन दृष्टिकोन मांडणारा ठरला आणि त्यांची मते खोडून काढणे कुणालाच शक्य झाले. त्यातून धर्मनिर्णय मंडळाची निर्मिती झाल्याचे सुदामे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र डोळके यांनीही भाष्य केले. परिचय डॉ. विलास देशपांडे यांनी करवून दिला. डॉ. विलास देशपांडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत दिलीप म्हैसाळकर यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, भाऊजी दप्तरी ट्रस्टचे राम दप्तरी, सुरेखा बापट, प्रतिमा आकरे, अपर्णा प्रभुणे, अरुण खोडे, प्रमोद कुलकर्णी, स्नेहल आगाशे, जयंत सुदामे, रेवती कुळकर्णी उपस्थित होते. संचालन प्रा. विवेक अलोणी यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर