शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारत जोडो यात्रेमुळेच संघप्रमुखांना मुस्लीम संघटना आठवल्या - योगेंद्र यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 10:46 IST

''संघाला देशातील महागाई व गरिबीही दिसली''

नागपूर :राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुस्लीम संघटनांशी भेटीगाठी कराव्या लागत आहेत. इतकेच नव्हे तर संघाच्या पदाधिकाऱ्यांना या देशात महागाई व गरिबी असल्याचेसुद्धा दिसून आले, अशी टीका स्वराज अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यादव म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक समर्थन मिळत आहे. यात्रेला केवळ एक महिनाच झाला आहे. या महिनाभरातच देशाचे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. ही यात्रा नागपुरातून जात नसली तरी त्याचा आवाज मात्र नागपूरपर्यंत ऐकू येत आहे. त्यामुळे यात्रा कुठूनही निघाली तरी ती देशाचे चित्र बदलणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात आजवर जितकेही हुकूमशहा (डिक्टेटर) झाले. त्यांचा शेवट हा नेहमीच वाईट झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला अरुणा सबाणे, श्यामसुंदर सोनारकर, वर्षा देशपांडे, शेखर सोनारकर, मिलिंद रानडे उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात इतिहास घडवेल

भारत जोडो यात्रेला आतापर्यंत चांगले समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात ही यात्रा इतिहास घडवेल, तशी तयारी सुरू झाली आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमधून ३३ यात्रा निघतील. प्रत्येक यात्रा ही देशाची संस्कृती दर्शविणारी राहील. ती महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या यात्रेत सहभागी होतील. हजारो लोक सहभागी होतील. ही यात्रा जितके दिवस महाराष्ट्रात राहील, तितके दिवस राहुल गांधी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती प्रतिभा शिंदे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, दक्षिणायनतर्फे गुरुवारी धनवटे नॅशनल कॉलेज येथे विविध जनसंघटनांची नागरिक सभा पार पडली. दिवसभर चाललेल्या या सभेत जवळपास ६० विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, डॉ. गणेश देवी, डॉ. सुखदेव थोरात, प्रतिभा शिंदे, मिलिंद रानडे, शेखर सोनाळकर आदी उपस्थित होते.

भाजपने या देशात विद्वेषाचे विष पेरले आहे. देशात अतिशय भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. देश वाचवायचा असेल तर ही परिस्थिती बदलावी लागेल. त्यासाठी आपापले मतभेद विसरून रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही. 'भारत जोडो यात्रा' ही देशाला वाचवण्यासाठीच असून यात आपापले सर्व मतभेद विसरून सामील व्हा, असे आवाहन योगेंद्र यादव यांनी सभेत केले. ते पुढे म्हणाले, ही यात्रा काँग्रेसने काढली असली तरी कुणी नेता किंवा पक्ष म्हणून आम्ही सहभागी नसून ही देशाची गरज आहे. देशाचा स्वधर्म धोक्यात आला आहे. देश तोडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांविरुद्ध देश जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

राम पुनियानी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगत असलेला धर्म माणूस तोडणारा आहे. खरा धर्म स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला माणसाला माणसाशी जोडणारा धर्म होय. आज जे सत्तेत आहेत. त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यात कुठेही सहभागी नव्हता. अशा लोकांशी आपल्याला लढावे लागेल. डॉ. गणेश देवी म्हणाले, की भारत जोडो ही पक्षापुरती लढाई नाही. ती देशाच्या हिताशी लढाई आहे. त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन अरुणा सबाने यांनी केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणYogendra Yadavयोगेंद्र यादवRahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूर