शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

भारत जोडो यात्रेमुळेच संघप्रमुखांना मुस्लीम संघटना आठवल्या - योगेंद्र यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 10:46 IST

''संघाला देशातील महागाई व गरिबीही दिसली''

नागपूर :राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुस्लीम संघटनांशी भेटीगाठी कराव्या लागत आहेत. इतकेच नव्हे तर संघाच्या पदाधिकाऱ्यांना या देशात महागाई व गरिबी असल्याचेसुद्धा दिसून आले, अशी टीका स्वराज अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यादव म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अपेक्षेपेक्षा अधिक समर्थन मिळत आहे. यात्रेला केवळ एक महिनाच झाला आहे. या महिनाभरातच देशाचे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. ही यात्रा नागपुरातून जात नसली तरी त्याचा आवाज मात्र नागपूरपर्यंत ऐकू येत आहे. त्यामुळे यात्रा कुठूनही निघाली तरी ती देशाचे चित्र बदलणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात आजवर जितकेही हुकूमशहा (डिक्टेटर) झाले. त्यांचा शेवट हा नेहमीच वाईट झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला अरुणा सबाणे, श्यामसुंदर सोनारकर, वर्षा देशपांडे, शेखर सोनारकर, मिलिंद रानडे उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात इतिहास घडवेल

भारत जोडो यात्रेला आतापर्यंत चांगले समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात ही यात्रा इतिहास घडवेल, तशी तयारी सुरू झाली आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमधून ३३ यात्रा निघतील. प्रत्येक यात्रा ही देशाची संस्कृती दर्शविणारी राहील. ती महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या यात्रेत सहभागी होतील. हजारो लोक सहभागी होतील. ही यात्रा जितके दिवस महाराष्ट्रात राहील, तितके दिवस राहुल गांधी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती प्रतिभा शिंदे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, दक्षिणायनतर्फे गुरुवारी धनवटे नॅशनल कॉलेज येथे विविध जनसंघटनांची नागरिक सभा पार पडली. दिवसभर चाललेल्या या सभेत जवळपास ६० विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, डॉ. गणेश देवी, डॉ. सुखदेव थोरात, प्रतिभा शिंदे, मिलिंद रानडे, शेखर सोनाळकर आदी उपस्थित होते.

भाजपने या देशात विद्वेषाचे विष पेरले आहे. देशात अतिशय भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. देश वाचवायचा असेल तर ही परिस्थिती बदलावी लागेल. त्यासाठी आपापले मतभेद विसरून रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही. 'भारत जोडो यात्रा' ही देशाला वाचवण्यासाठीच असून यात आपापले सर्व मतभेद विसरून सामील व्हा, असे आवाहन योगेंद्र यादव यांनी सभेत केले. ते पुढे म्हणाले, ही यात्रा काँग्रेसने काढली असली तरी कुणी नेता किंवा पक्ष म्हणून आम्ही सहभागी नसून ही देशाची गरज आहे. देशाचा स्वधर्म धोक्यात आला आहे. देश तोडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांविरुद्ध देश जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

राम पुनियानी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगत असलेला धर्म माणूस तोडणारा आहे. खरा धर्म स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला माणसाला माणसाशी जोडणारा धर्म होय. आज जे सत्तेत आहेत. त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यात कुठेही सहभागी नव्हता. अशा लोकांशी आपल्याला लढावे लागेल. डॉ. गणेश देवी म्हणाले, की भारत जोडो ही पक्षापुरती लढाई नाही. ती देशाच्या हिताशी लढाई आहे. त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन अरुणा सबाने यांनी केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणYogendra Yadavयोगेंद्र यादवRahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूर