शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

भाई बर्धन हे सर्व सामान्यांचे नेते होते : मान्यवरांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:24 IST

सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देभाई बर्धन यांना विनम्र अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) च्या वतीने ए. बी. बर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त रेल्वेस्थानक मार्गावरील परवाना भवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहनदास नायडु होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी कान्नन गोपीनाथन, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, आयटकचे महासचिव शाम काळे, बी. एन. जे. शर्मा, मोहन शर्मा उपस्थित होते. काश्मीर प्रश्नावर आय. ए. एस. पदाचा राजीनामा देणारे कान्नन गोपीनाथन म्हणाले, देशात प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यात येत आहे. लोकशाहीत जेव्हा जनता प्रश्न विचारणे बंद करते तेव्हा देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे होते. शासन एकामागुन एक चुकीचे निर्णय घेत आहे. पैसा नसल्यामुळे बीपीसीएलचे खाजगीकरण करण्यात येत असून त्याला आर्थिक सुधारणेचे नाव देण्यात येत आहे. त्यामुळे अन्याय सहन करण्याची सवय सोडून, नागरिकांनी आपले कर्तव्य ओळखण्याची गरज आहे. ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले, भाई बर्धन यांना भेटू शकलो, बोलू शकलो ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. राजकीय क्षेत्रात पारदर्शकता कशी जोपासावी याचा धडा त्यांनी घालून दिला. सामान्य नागरिकांना बर्धन आपलेसे वाटत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन जमिनीशी नाते कायम ठेवणारे बर्धन यांचा आदर्श बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोहन शर्मा म्हणाले, भाई बर्धन यांनी आदिवासी, कामगार, कष्टकºयांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचले. दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाई बर्धन आणि सुदाम देशमुख यांना व्यासपीठावर बोलावले होते. आयटकच्या माध्यमातून देशातील सर्व ट्रेड युनियनला बर्धन यांनी एका सूत्रात बांधल्याचे मोहन शर्मा यांनी सांगितले. यावेळी टी. एस. बुचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन मोहन शर्मा यांनी केले. आभार आयटकचे महासचिव शाम काळे यांनी मानले.

 

टॅग्स :Communist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाnagpurनागपूर