शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

भाई बर्धन हे सर्व सामान्यांचे नेते होते : मान्यवरांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:24 IST

सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देभाई बर्धन यांना विनम्र अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सधन कुटुंबातील असूनही ए. बी. बर्धन यांनी पीडित-शोषित, आदिवासी, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आयुष्यभर त्यांनी आपले जमिनीशी नाते कायम ठेवले. त्यामुळे भाई बर्धन हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेते होते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) च्या वतीने ए. बी. बर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त रेल्वेस्थानक मार्गावरील परवाना भवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहनदास नायडु होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सनदी अधिकारी कान्नन गोपीनाथन, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, आयटकचे महासचिव शाम काळे, बी. एन. जे. शर्मा, मोहन शर्मा उपस्थित होते. काश्मीर प्रश्नावर आय. ए. एस. पदाचा राजीनामा देणारे कान्नन गोपीनाथन म्हणाले, देशात प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यात येत आहे. लोकशाहीत जेव्हा जनता प्रश्न विचारणे बंद करते तेव्हा देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे होते. शासन एकामागुन एक चुकीचे निर्णय घेत आहे. पैसा नसल्यामुळे बीपीसीएलचे खाजगीकरण करण्यात येत असून त्याला आर्थिक सुधारणेचे नाव देण्यात येत आहे. त्यामुळे अन्याय सहन करण्याची सवय सोडून, नागरिकांनी आपले कर्तव्य ओळखण्याची गरज आहे. ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले, भाई बर्धन यांना भेटू शकलो, बोलू शकलो ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. राजकीय क्षेत्रात पारदर्शकता कशी जोपासावी याचा धडा त्यांनी घालून दिला. सामान्य नागरिकांना बर्धन आपलेसे वाटत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन जमिनीशी नाते कायम ठेवणारे बर्धन यांचा आदर्श बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोहन शर्मा म्हणाले, भाई बर्धन यांनी आदिवासी, कामगार, कष्टकºयांच्या प्रश्नांसाठी आयुष्य वेचले. दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाई बर्धन आणि सुदाम देशमुख यांना व्यासपीठावर बोलावले होते. आयटकच्या माध्यमातून देशातील सर्व ट्रेड युनियनला बर्धन यांनी एका सूत्रात बांधल्याचे मोहन शर्मा यांनी सांगितले. यावेळी टी. एस. बुचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन मोहन शर्मा यांनी केले. आभार आयटकचे महासचिव शाम काळे यांनी मानले.

 

टॅग्स :Communist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाnagpurनागपूर