शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सावधान, गोवरचे संक्रमण विदर्भातही पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 14:37 IST

हा तर कोरोनाचाही बाप : महानगरपालिका अलर्ट; इस्पितळांमध्ये व्हॅक्सिन उपलब्ध

नागपूर : कोरोना संक्रमणाचे सत्र आटोपत नाही तोच राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘खसरा (मिजल्स)’ अर्थात ‘गोवर’चा प्रकोप वाढायला लागला आहे. विशेषतः याचे संक्रमण नवजातकांपासून ते बालकांपर्यंतच होत असून, आतापर्यंत राज्यात या संक्रमणाने नऊ मुलांचा जीव गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन रुग्णांचे समीक्षण आणि आवश्यक पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते.

कोरोना संक्रमणाच्या तुलनेत ‘खसरा’ संक्रमणाचा वेग कित्येक पटीने जास्त आहे. चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार वेळेत एमआर व्हॅक्सिन दिली गेली तर या संक्रमणाच्या तीव्रतेपासून बऱ्यापैकी बचाव केला जाऊ शकतो. विदर्भात अकोला, अमरावतीपर्यंत हे संक्रमण पोहोचले असून, नागपुरात या अवघड स्थितीचा सामना करण्याची तयारी झाली आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये एमआर व्हॅक्सिन उपलब्ध करवून देण्यात आली आहेत.

मनपाच्या आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्या कुटुंबात पाच वर्षापर्यंतची मुले आहेत, त्यांना व्हॅक्सिन देण्याचे आवाहन केले जात आहे. श्वसन यंत्रणेवर विषाणूच्या संक्रमणाने गोवर होतो. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकल्यासारखी लक्षणे असतात. ९० टक्के नागरिक ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे आणि जे संक्रमित व्यक्तीसोबत एकाच घरात राहतात, ते या आजाराला बळी पडू शकतात. हे संक्रमण १४ दिवसांपर्यंत प्रभावी राहते आणि दोन ते चार दिवसांपूर्वी शरीरावर दाणे उमळण्यास सुरुवात हाेते. अशक्त आणि कुपोषित बालकांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता अधिक आहे. लक्षण दिसताच उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घरगुती उपचारांत वेळ घालवणे धोक्याचे ठरू शकते. विशेष म्हणजे, या आजारावर कोणताच उपचार नाही. परंतु, लक्षणांच्या आधारावर उपचार सुरू करता येते.

तत्काळ मुलांचे लसीकरण करा

- गोवरसंदर्भात राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असल्याचे मनपाचे संक्रमण अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले. ज्या मुलांना एमआर व्हॅक्सिन दिले गेले नाही त्यांना ही लस तात्काळ देणे गरजेचे आहे. नागपुरात सद्य:स्थिती हे संक्रमण पोहोचलेले नाही. परंतु, संक्रमणाचा वेग अतिशय तीव्र असल्याने सजगता बाळगणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर एका महिन्यात शरीरात ॲण्टीबॉडी तयार व्हायला लागत असल्याचे नवखरे यांनी सांगितले.

प्रमुख मुद्दे

- शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये एमएमआर किंवा एमआर लस उपलब्ध आहे. ही लस नऊ महिन्यांपर्यंत आणि त्यानंतर १८ ते २४ महिन्यांच्या दरम्यान देणे गरजेचे आहे.

- नागपूर मनपा क्षेत्रात जुलैनंतर एकाही गोवरच्या रुग्णाची नाेंद झालेली नाही. परंतु, विदर्भातील अनेक भागात याचा प्रकोप वाढला असल्याने सजगता बाळगणे गरजेचे आहे.

- मार्चपासून आतापर्यंत नऊ महिन्यांपर्यंतच्या २३ हजार मुलांना ही लस दिली आहे, तर १८ ते २४ महिन्यांपर्यंतच्या २१ हजार मुलांनी ही लस घेतली आहे. दुसरी मात्रा घेण्यासाठी नागरिकांनी तत्परता दाखवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर