शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या आश्वासनांपासून सावध राहा

By admin | Updated: October 11, 2014 02:52 IST

भाजपाने चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. परंतु अद्याप त्या दिशेने सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही.

नागपूर/भंडारा : भाजपाने चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. परंतु अद्याप त्या दिशेने सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही. आता महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला खोटी आश्वासने देत महाराष्ट्रभर फिरत आहेत. तेव्हा खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहा, असा इशारा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज येथे दिला. काँग्रेस-भाजपाने आजवर निवडणुकीदरम्यान कित्येक आश्वासने दिली आहेत. परंतु त्यातील किती आश्वासने आजवर पूर्ण केलीत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भंडारा विधानसभा क्षेत्राच्या बसपाचे उमेदवार देवांगणा विजय गाढवे यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानावर तर नागपुरातील बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कस्तूरचंद पार्कवर आयोजित जाहीर सभेला त्या मार्गदर्शन करीत होत्या. बसपाचे ज्येष्ठ नेते सतीशचंद्र, खा. वीरसिंह, डॉ. सुरेश माने, कृष्णा बेले आणि बसपाचे उमेदवार किशोर गजभिये (उत्तर नागपूर), सत्यभामा लोखंडे (दक्षिण नागपूर) आणि राजेन्द्र पडोळे (दक्षिण- पश्चिम नागपूर) आदींसह सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. मायावती पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर या देशात काँग्रेस व भाजपाच्या हातात सत्ता राहिली आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही या देशातील दलित, शोषित, मजूर गरीबांच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही. त्यांची साामजिक व आर्थिक परिस्थिती हलाखीचीच आहे. गरिबी आणि दारिद्र्यातच जीवन जगत आहेत. याला या देशातील सत्ताधारी लोकचं जबाबदार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील समाजबांधवांना संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाची सुविधा दिली होती. त्याच्या आधारावर हा समाज आपली प्रगती करीत आहे, परंतु हे आरक्षण हळूहळू संपविण्याचे कारस्थान सध्या देशात सुरू आहे. काँग्रेस-भाजपासह सर्वच राजकीय पक्ष हे धनाढ्य व उद्योगपतींच्या मदतीने सरकार स्थापन करीत असतात त्यामुळे सत्तेत आल्यावर ते सामान्यजनांचा विकास कसा करणार? केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, केवळ मूठभर श्रीमंत लोकांच्याच विकासाचे धोरण राबवित असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच महागाई वाढत असल्याची जाहीर टीकासुद्धा त्यांनी यावेळी केली. मायावती यांनी यावेळी रिपाइं नेत्यांवरही नाव न घेता प्रहार केला. (प्रतिनिधी)