शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:35 IST

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नुकतीच मुंबई एटीएसने केलेली कारवाई लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चार पातळींवर बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे.

ठळक मुद्देपोलिसांची गस्त वाढली : अतिमहत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नुकतीच मुंबई एटीएसने केलेली कारवाई लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चार पातळींवर बंदोबस्ताची व्यूहरचना केली आहे.मुंबई पोलिसांनी नुकतीच छापामार कारवाई करून मोठ्या प्रमाणावर गावठी बॉम्ब, देशी पिस्तूल आणि स्फोटके जप्त केली. अटक करण्यात आलेल्यांकडून ठिकठिकाणी घातपात घडवून आणण्याची माहिती पुढे आल्यामुळे सर्वत्र अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागपूर हे आधीपासूनच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. येथे दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, कामठीचे गार्ड रेजिमेंट सेंटरसह महत्त्वपूर्ण आणि अतिसंवेदनशील स्थळे आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दहशतवादी येथे घातपात किंवा दंगल घडवून आणू शकतात, हे ध्यानात घेत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपाययोजनांबद्दल त्यांना निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर, दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, विधानभवन, विमानतळ, रेल्वेस्थानक, न्यायालय, विभागीय आयुक्त कार्यालयासह अतिमहत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.शीघ्र कृती दलाच्या जवानांना २४ तास दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत दिवस आणि रात्रीची गस्त वाढविण्याच्याही सूचना करण्यात आल्या. समाजकंटक शहरात शिरू नये म्हणून ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली. संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली दिसल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.असा आहे बंदोबस्त४० ठिकाणी नाकेबंदी१०३ ठिकाणी फिक्स पॉर्इंटठिकठिकाणी क्यूआरटी, आरसीपी आणि साध्या गणवेषातील पोलीसव्यक्तींसोबत वाहनांचीही तपासणी, शहरातील सर्व डीसीपी रस्त्यावरआम्ही सज्ज आहोत : डॉ. उपाध्यायशहराला कोणत्याही प्रकारचा धोका किंवा धमकी नाही. मात्र, ऐनवेळी कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास आम्ही कारवाईसाठी सज्ज आहोत, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. नागरिकांनीही कायद्याचे पालन करावे. रॅलीत गोंधळ करू नये किंवा डीजे वाजवू नये, सतर्क राहून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करावा, असे आवाहन डॉ. उपाध्याय यांनी केले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयnagpurनागपूर