शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५

By admin | Updated: November 8, 2015 02:59 IST

वसुबारसपासून दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते. परंतु खरी दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

भाऊबीज दुपारी आणि रात्रीही साजरी करू शकतानागपूर : वसुबारसपासून दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते. परंतु खरी दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. धनत्रयोदशीचा हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला होता. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे. लक्ष्मीपूजन निश्चित वेळेनुसार केल्यास ज्योतिष्यशास्त्रात शुभ मानले जाते. येणाऱ्या दिवाळीला रात्री ७.३० ते १०.४५ दरम्यान लक्ष्मीपूजन केल्यास शुभ राहील असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी अनुकूल काळ सकाळी ९.३० ते १०.४८ तर दुपारी ३.०५ ते ५.४६ आहे. हा दिवस धार्मिक कार्यांमध्ये व्यतित करणे योग्य ठरेल. कणकीचा दिवा लागून त्याचे तोंड दक्षिणेकडे करावे, यामुळे अपमृत्यू ठळतो. तांबूस व पांढऱ्या रंगाचा वापर दिलासजनक राहील. शंकराची उपासना ताण हलका करेल. महत्त्वाची कामे टाळणे योग्यच राहील, असा सल्ला वैद्य यांनी दिला आहे. १० नोव्हेंबर नरकचतुर्दशी हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी पहाटे ५.०६ वाजता सूर्यादय आहे. यावेळेस अभ्यंगस्नान करावे. रात्री ९.२० ला अमावस्याचा प्रारंभ असून, ११ नोव्हेंबरला रात्री ११.१४ ला अमावस्येची समाप्ती आहे. ११ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी काळसर व पिवळसर रंगछटांचा वापर महत्त्वपूर्ण ठरेल. हा दिवस आर्थिक उलाढाली, धार्मिक बाबी व दानधर्मासाठी अनुकूल राहील. पांडुरंगाची उपासना, लक्ष्मी-विष्णूची उपासना तसेच कुबेराचे पूजन करतात. लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५ आहे. १२ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा अर्थात पाडवा हा दिवस सर्वच राशीच्या लोकांना अनुकूल अहे. श्रीदत्तात्रय व अग्निउपासना लाभकारी राहील. भाऊबीज शुक्रवारी १३ नोव्हेंबरला आहे. हा दिवस अतिशय मंगलकारी आहे. काळसर व फिकट निळा रंगछटांचा वापर उपकारक ठरेल. भाऊबीजेसाठी सर्वोत्तम वेळ दुपारी १२.१५ ते १.३५ व रात्री ९.५ ते १०.३५ आहे. (प्रतिनिधी)