शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

३ लाख ७७ हजार कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:02 IST

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

ठळक मुद्देयोजनेच्या लाभासाठी ई-कार्ड तयार करणे आवश्यकसर्व कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ई-कार्ड तयार करण्याची सुविधापाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारजिल्ह्यातील २६ रुग्णालयात मिळणार उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख पात्र लाभार्थ्यांना ९७१ आजारावर पूर्णपणे नि:शुल्क उपचार उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेतील कुटुंबांच्या सदस्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठविले असून, या पत्रासह रेशनकार्ड आदी कागदपत्र, दोन पासपोर्ट साईजचे फोटो गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जमा करून लाभार्थ्यांनी आपले ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ई-कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्यांना ३० रुपये भरणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अंगिकृत शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा नि:शुल्क राहणार आहे. यामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचार, मानसिक आजारावरील उपचाराचासुद्धा समावेश आहे. कुटुंबाचा समावेश असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर येथे संगणक प्रणालीद्वारे कुटुंब ई-कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंब ई-कार्ड तयार करण्यासाठी तालुक्याचे आरोग्य सेवक, सेविका, आशा यांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांचे पत्र वाटप करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांची यादी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना शहर व ग्रामीण या दोन्ही भागांसाठी लागू असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शहरातील आपले सरकार सेवा पोर्टल व ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन ई-कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरprime ministerपंतप्रधानHealthआरोग्य