शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

३ लाख ७७ हजार कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:02 IST

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

ठळक मुद्देयोजनेच्या लाभासाठी ई-कार्ड तयार करणे आवश्यकसर्व कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ई-कार्ड तयार करण्याची सुविधापाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारजिल्ह्यातील २६ रुग्णालयात मिळणार उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख पात्र लाभार्थ्यांना ९७१ आजारावर पूर्णपणे नि:शुल्क उपचार उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेतील कुटुंबांच्या सदस्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठविले असून, या पत्रासह रेशनकार्ड आदी कागदपत्र, दोन पासपोर्ट साईजचे फोटो गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जमा करून लाभार्थ्यांनी आपले ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ई-कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्यांना ३० रुपये भरणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अंगिकृत शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा नि:शुल्क राहणार आहे. यामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचार, मानसिक आजारावरील उपचाराचासुद्धा समावेश आहे. कुटुंबाचा समावेश असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर येथे संगणक प्रणालीद्वारे कुटुंब ई-कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंब ई-कार्ड तयार करण्यासाठी तालुक्याचे आरोग्य सेवक, सेविका, आशा यांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांचे पत्र वाटप करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांची यादी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना शहर व ग्रामीण या दोन्ही भागांसाठी लागू असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शहरातील आपले सरकार सेवा पोर्टल व ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन ई-कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरprime ministerपंतप्रधानHealthआरोग्य