शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘ही तर भारतीय खेळांच्या सुवर्णयुगाची नांदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 08:30 IST

Nagpur News टोकियोतील ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सुवर्णयुगाची नांदी असल्याचे मत फिट इंडिया मुव्हमेंटचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर आणि स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अर्जुनसिंग राणा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देफिट इंडिया मुव्हमेंटचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर अर्जुनसिंग राणा यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : टोकियोतील ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सुवर्णयुगाची नांदी असल्याचे मत फिट इंडिया मुव्हमेंटचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर आणि स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अर्जुनसिंग राणा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. (‘This is the beginning of the golden age of Indian sports’)

मैत्री परिवारतर्फे आयोजित मैत्री गौरव शारीरिक शिक्षण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेले राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय क्रिकेट संघाचे फिजिओ राहिलेले राणा म्हणाले, ‘खरेतर हा नव्या भारताचा उदय आहे. केन्द्र शासनाने खेलो इंडियासारख्या योजनांच्या माध्यमातून ऑलिम्पिकमधील कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. योजनेच्या माध्यमातून प्रतिभावान आणि मेहनती खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत.’

फिट इंडिया मुव्हमेंट ही संकल्पना मांडताना अमरावतीच्या एचव्हीपीएममधून शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेले राणा पुढे म्हणाले,‘फिट इंडिया योजनेचा उद्देश प्राणायाम आणि योगसाधनेच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक सुदृढता आणणे हा आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर योजनेचा विस्तार केला जाईल.

रातुम नागपूर विद्यापीठात लवकरच फिट इंडिया क्लबची स्थापना केली जाईल. यात क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांना सहभागी करून घेतले जाईल, या बाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोलणे झाल्याची माहिती राणा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

टोकियो ऑलिम्पिकमधील नेमबाज आणि तिरंदाज यांच्या अपयशाबाबत विचारताच राणा म्हणाले, ‘प्रत्येक दिवस सारखा नसतो. यात खेळाडूंची मानसिकता महत्त्वपूर्ण ठरते. माझ्या मते, पुढील ऑलिम्पिकमध्ये आमचे नेमबाज आणि तिरंदाज पदके जिंकण्यात यशस्वी होतील.’ यावेळी मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, डॉ. शरद सूर्यवंशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

रॉडनी मार्शने आणली जिम संस्कृती

राणा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या यशात खेळाडूंचे फिटनेस महत्त्वाचे ठरल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत फिटनेसला फार महत्त्व देण्यात आले. २००० ला रॉडनी मार्श यांनी भारतीय क्रिकेटमध्ये जिम संस्कृती रुजविली. कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी मत मांडताना ते म्हणाले, ‘हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय असावा.’

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा