शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा  : शैलेश बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 20:24 IST

अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा पंधरवड्याला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अ‍ॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याला सुरुवात झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अभियानाचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहरचे शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीणचे श्रीपाद वाडेकर आदी उपस्थित होते.शैलेश बलकवडे म्हणाले, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्यामुळेच अपघात वाढले आहेत. यामुळे वाहतूक सुरक्षेला घेऊन प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग महत्त्वाचा आहे, तरच अपघात कमी होतील. शिवाजी बोडखे यांनी यावेळी प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम पाळणे का आवश्यक आहे याची मीमांसा करून वाहनधारकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली तर वाहतूक पोलिसांची गरज भासणार नाही, अपघाताला आळा बसेल, असेही ते म्हणाले. सुधाकर तेलंग यांनी अपघातांच्या कारणांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.प्रास्ताविक शरद जिचकार यांनी केले. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्यानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रम, आरोग्य शिबिर व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची माहिती दिली. संचालन मार्तंड नेवासकर यांनी केले तर आभार पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी मानले. कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सामाजिक कार्यकर्ता व स्वातंत्र्य संग्राम सेनानी शंकरराव लांजेवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जीवन सुरक्षाचे राजीव वाघ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध देशपांडे, राजवर्धन करपे, अनंत भोसले, मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहड आदी उपस्थित होते.चित्र प्रदर्शनाचे कौतुकरस्ता सुरक्षा या विषयाला घेऊन शहर आरटीओ कार्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात ८० चित्रांचा समावेश असून हेल्मेटपासून ते सीटबेल्ट, हेडफोन, अमली पदार्थांचे व्यसन व वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर प्रकाश टाकला. सर्वच चित्रे सुंदर रेखाटली असून प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रदर्शनाचे आयोजन करण्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे व विनोद जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर