शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 19:45 IST

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनागपुरातील पाचपावलीत थरार, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.आरोपी रितिकचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. ती गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. पाठलाग करून तिच्याशी सलगी साधण्याचे त्याने अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले आहे. तरुणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिने दाद दिली नाही. उलट त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे तो सायको बनला. दारूच्या नशेत रितिक नेहमी उलटसुलट प्रकार करतो. सोमवारी रात्री १० च्या सुमारास त्याने हातात चाकू घेऊन तांडापेठ परिसरात गोंधळ घालणे सुरू केले. त्याची समजूत काढायला आलेल्या राजू गोविंदराव नंदनवार, जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर (वय ४२), रमेश श्रावण निघारे (वय ५०), प्रतिश सुरेंद्र खापरे (वय १५) आणि मोहम्मद शेखावत अंसारी (वय ३५) या पाच जणांवर एका पाठोपाठ चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. वस्तीतील लोकांनी एकत्र होऊन आरोपी रितिकला पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. आरोपी रितिकला प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.गणेशपेठ पोलिसांचा हलगर्जीपणाआरोपी रितिक आधीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर लकडगंज आणि पाचपावली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पीडित तरुणीनेही दोन वेळा गणेशपेठ ठाण्यात रितिकविरुद्ध तक्रार नोंदवली. मात्र, तेथील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र (एनसी) नोंद करून रितिकला सोडून दिले. त्यामुळेच सोमवारी रात्रीचा थरार घडला. गणेशपेठ पोलिसांनी त्याला अटक करून आतमध्ये डांबले असते तर हा प्रकारच घडला नसता, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट