शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने तो बनला सायको : पाच जणांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 19:45 IST

एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनागपुरातील पाचपावलीत थरार, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. तो तांडापेठमध्ये राहतो. घटनेनंतर त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.आरोपी रितिकचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. ती गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. पाठलाग करून तिच्याशी सलगी साधण्याचे त्याने अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले आहे. तरुणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिने दाद दिली नाही. उलट त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे तो सायको बनला. दारूच्या नशेत रितिक नेहमी उलटसुलट प्रकार करतो. सोमवारी रात्री १० च्या सुमारास त्याने हातात चाकू घेऊन तांडापेठ परिसरात गोंधळ घालणे सुरू केले. त्याची समजूत काढायला आलेल्या राजू गोविंदराव नंदनवार, जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर (वय ४२), रमेश श्रावण निघारे (वय ५०), प्रतिश सुरेंद्र खापरे (वय १५) आणि मोहम्मद शेखावत अंसारी (वय ३५) या पाच जणांवर एका पाठोपाठ चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. वस्तीतील लोकांनी एकत्र होऊन आरोपी रितिकला पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. आरोपी रितिकला प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.गणेशपेठ पोलिसांचा हलगर्जीपणाआरोपी रितिक आधीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर लकडगंज आणि पाचपावली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पीडित तरुणीनेही दोन वेळा गणेशपेठ ठाण्यात रितिकविरुद्ध तक्रार नोंदवली. मात्र, तेथील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र (एनसी) नोंद करून रितिकला सोडून दिले. त्यामुळेच सोमवारी रात्रीचा थरार घडला. गणेशपेठ पोलिसांनी त्याला अटक करून आतमध्ये डांबले असते तर हा प्रकारच घडला नसता, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट