शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:05 IST

मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : ‘भाषा, अभिजातता आणि आपण’वर परिसंवाद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, धरमपेठ राजाराम वाचनालय आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त सर्वोदय आश्रम सभागृहात आयोजित ‘भाषा, अभिजातता आणि आपण’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख अतिथी प्रा. वसंत आबाजी डहाके तर प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. शांताराम दातार, नागेश चौधरी, वसंत त्रिपाठी व डॉ. प्रकाश परब उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, उद्या विदर्भ वेगळा झाला तर या राज्याची राज्यभाषा कोणती राहील इतका संभ्रम आहे. कारण, भाषेची भेसळच मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठीचे अभिजातत्व जपायचे असेल तर मराठी सक्तीचा शिक्षण कायदा करण्यासोबतच ती घराघरात आत्मियतेने बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. वसंत त्रिपाठी म्हणाले, कुठल्याही एका भाषेच्या विकासाचा अट्टहास अयोग्य आहे. प्रत्येक भाषेची आपली एक विशेषत: असते. डॉ. प्रकाश परब म्हणाले, शासन आणि समाज दोघांनी मिळून भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी झटले पाहिजे. मुख्यत्चे मराठी भाषेचे प्राध्यापक आणि पत्रकार यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. शांताराम दातार यांनी न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागेश चौधरी यांनी प्रमाण भाषेचा आग्रह हा आदिवासी, गोंड आदी जमातींसाठी घातक असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून भाषा, अभिजातता आणि आपण या तिन्हीचा आढावा घेतला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर