शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:05 IST

मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : ‘भाषा, अभिजातता आणि आपण’वर परिसंवाद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, धरमपेठ राजाराम वाचनालय आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त सर्वोदय आश्रम सभागृहात आयोजित ‘भाषा, अभिजातता आणि आपण’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख अतिथी प्रा. वसंत आबाजी डहाके तर प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. शांताराम दातार, नागेश चौधरी, वसंत त्रिपाठी व डॉ. प्रकाश परब उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, उद्या विदर्भ वेगळा झाला तर या राज्याची राज्यभाषा कोणती राहील इतका संभ्रम आहे. कारण, भाषेची भेसळच मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठीचे अभिजातत्व जपायचे असेल तर मराठी सक्तीचा शिक्षण कायदा करण्यासोबतच ती घराघरात आत्मियतेने बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. वसंत त्रिपाठी म्हणाले, कुठल्याही एका भाषेच्या विकासाचा अट्टहास अयोग्य आहे. प्रत्येक भाषेची आपली एक विशेषत: असते. डॉ. प्रकाश परब म्हणाले, शासन आणि समाज दोघांनी मिळून भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी झटले पाहिजे. मुख्यत्चे मराठी भाषेचे प्राध्यापक आणि पत्रकार यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. शांताराम दातार यांनी न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागेश चौधरी यांनी प्रमाण भाषेचा आग्रह हा आदिवासी, गोंड आदी जमातींसाठी घातक असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून भाषा, अभिजातता आणि आपण या तिन्हीचा आढावा घेतला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर