शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:05 IST

मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : ‘भाषा, अभिजातता आणि आपण’वर परिसंवाद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत नाही तोपर्यंत मराठीचे दिवस फिरणार नाहीत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, धरमपेठ राजाराम वाचनालय आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त सर्वोदय आश्रम सभागृहात आयोजित ‘भाषा, अभिजातता आणि आपण’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख अतिथी प्रा. वसंत आबाजी डहाके तर प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. शांताराम दातार, नागेश चौधरी, वसंत त्रिपाठी व डॉ. प्रकाश परब उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, उद्या विदर्भ वेगळा झाला तर या राज्याची राज्यभाषा कोणती राहील इतका संभ्रम आहे. कारण, भाषेची भेसळच मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठीचे अभिजातत्व जपायचे असेल तर मराठी सक्तीचा शिक्षण कायदा करण्यासोबतच ती घराघरात आत्मियतेने बोलली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. वसंत त्रिपाठी म्हणाले, कुठल्याही एका भाषेच्या विकासाचा अट्टहास अयोग्य आहे. प्रत्येक भाषेची आपली एक विशेषत: असते. डॉ. प्रकाश परब म्हणाले, शासन आणि समाज दोघांनी मिळून भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी झटले पाहिजे. मुख्यत्चे मराठी भाषेचे प्राध्यापक आणि पत्रकार यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. शांताराम दातार यांनी न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागेश चौधरी यांनी प्रमाण भाषेचा आग्रह हा आदिवासी, गोंड आदी जमातींसाठी घातक असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून भाषा, अभिजातता आणि आपण या तिन्हीचा आढावा घेतला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर