शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:07 IST

यावर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे.

ठळक मुद्देनाग, पिवळी व पोहरा नद्यांचे पात्र स्वच्छ सौंदर्यीकरणाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग, पिवळी व पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव. मात्र दुर्लक्ष केल्याने एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे.या तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण तिची मूळ ओळख मिटवणारे आहे. उद्योगांचे घाण पाणी, सांडपाणी या नदीला सोडल्याने दुर्गंधीसोबत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. प्रवाह मोकळा झाला आहे. नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सीएसआर निधीतून करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेकोलि, मॉईल, एनएचएआय आदींच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात आले आहे. मनपाने विविध मशीन आणि वाहनांसाठी लागणारे डिझेल पुरविले आहे.तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे त्यांची वास्तविक रुंदी कमी झालेली आहे. नाग नदीची एकूण लांबी १७.०५ किमी आहे. हा सर्व भाग स्वच्छ करण्यात आला आहे.पिवळी नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचाही सर्व भाग स्वच्छ झालेला आहे. पोहरा नदी शंकरनगर ते नरेंद्रनगर ते पिपळा फाटा ते नरसाळा, विहीरगाव अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० कि.मी. आहे. नदीचा संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आलेला आहे.नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करून स्वच्छता झाली आहे. नाग नदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. लवकरच आपल्याला नाग नदीचे स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, याप्रकारचे नियोजन सुरू झाले आहे. भविष्यात नाग नदीच्या किनाऱ्यावर बगिच्यांमध्ये नागरिक व्यायाम, जॉगिंग करतील हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे. त्यातून पर्यटनाला बळ मिळेल. नाग नदी पुनरुज्जीवित करण्याचा मनपाचा संकल्प असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. तीनही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. हा ठेवा नागरिकांनी कसा जपून ठेवायचा, हे त्यांच्या हातात आहे. नागरिकांनी यात कचरा टाकू नये, जनावरे सोडू नये, जेणेकरून या नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास, दुर्गंधी टाळण्यास आणि प्रवाह असाच बाराही महिने मोकळा राहण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचा कृतीतून सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांची कृतीच हा वारसा, ही संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू शकते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :riverनदी