शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:07 IST

यावर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे.

ठळक मुद्देनाग, पिवळी व पोहरा नद्यांचे पात्र स्वच्छ सौंदर्यीकरणाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग, पिवळी व पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव. मात्र दुर्लक्ष केल्याने एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे.या तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण तिची मूळ ओळख मिटवणारे आहे. उद्योगांचे घाण पाणी, सांडपाणी या नदीला सोडल्याने दुर्गंधीसोबत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. प्रवाह मोकळा झाला आहे. नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सीएसआर निधीतून करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेकोलि, मॉईल, एनएचएआय आदींच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात आले आहे. मनपाने विविध मशीन आणि वाहनांसाठी लागणारे डिझेल पुरविले आहे.तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे त्यांची वास्तविक रुंदी कमी झालेली आहे. नाग नदीची एकूण लांबी १७.०५ किमी आहे. हा सर्व भाग स्वच्छ करण्यात आला आहे.पिवळी नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचाही सर्व भाग स्वच्छ झालेला आहे. पोहरा नदी शंकरनगर ते नरेंद्रनगर ते पिपळा फाटा ते नरसाळा, विहीरगाव अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० कि.मी. आहे. नदीचा संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आलेला आहे.नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करून स्वच्छता झाली आहे. नाग नदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. लवकरच आपल्याला नाग नदीचे स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, याप्रकारचे नियोजन सुरू झाले आहे. भविष्यात नाग नदीच्या किनाऱ्यावर बगिच्यांमध्ये नागरिक व्यायाम, जॉगिंग करतील हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे. त्यातून पर्यटनाला बळ मिळेल. नाग नदी पुनरुज्जीवित करण्याचा मनपाचा संकल्प असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. तीनही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. हा ठेवा नागरिकांनी कसा जपून ठेवायचा, हे त्यांच्या हातात आहे. नागरिकांनी यात कचरा टाकू नये, जनावरे सोडू नये, जेणेकरून या नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास, दुर्गंधी टाळण्यास आणि प्रवाह असाच बाराही महिने मोकळा राहण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचा कृतीतून सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांची कृतीच हा वारसा, ही संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू शकते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :riverनदी