शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सावधान ! आपले फेसबुक प्रोफाईल हॅक होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:29 IST

आपले फेसबुक सुरक्षित आहे, या संकल्पनेतून आता हळूहळू आपण सगळेजण बाहेर येत आहोत. विविध प्रकारे आपले फेसबुक प्रोफाईल हॅक केले जाऊ शकते. या माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय टेक्निकल व्याख्याते व सायबर सुरक्षातज्ज्ञ महेश राखेजा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षातज्ज्ञ महेश राखेजा यांनी दिल्या टीप्स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले फेसबुक सुरक्षित आहे, या संकल्पनेतून आता हळूहळू आपण सगळेजण बाहेर येत आहोत. विविध प्रकारे आपले फेसबुक प्रोफाईल हॅक केले जाऊ शकते. या माध्यमाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय टेक्निकल व्याख्याते व सायबर सुरक्षातज्ज्ञ महेश राखेजा यांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षेविषयी जनमानसात असणाऱ्या जनजागृतीचा अभाव व निष्काळजीपणा सायबर गुन्हेगारीच्या घटनांना कारणीभूत ठरतो असेही त्यांनी सांगितले.सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नागपूर जिल्हा माहिती कार्यालय नागपूर व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ या अंतर्गत सायबर सुरक्षा या विषयावर माध्यम प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, नागपूरचे संयुक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर शहर सायबर क्राईमच्या उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, विद्या विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यावेळी उपस्थित होते.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया अभियानास सायबर सुरक्षित डिजिटल व्यवहार निश्चितपणे चालना देतील,अशी आशाही राखेजा यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेदरम्यान सायबरसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या सुरक्षा टीप्सबद्दल त्यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.जागतिक आंतरजाल (वर्ल्ड वाईड वेब) हे न्यू मीडियाच्या माध्यमातून आता ‘वेब २.०’ या नव्या रूपात आले असून ते जास्त परस्परसंवादी (इंटरअ‍ॅक्टिव्ह) झाले आहे. नागरिक ते शासन, व्यापार ते व्यापार हा संवाद आता समाज माध्यमांद्वारे जागतिक स्तरावर आॅनलाईन झाला आहे, असे कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना अनुप कुमार यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी वापरामुळे या क्षेत्रातील कुशल तंत्रज्ञासोबतच सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. इंटरनेट फ्रॉड, आयडेंटिटी थेफ्ट यासारख्या सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आपण सज्ज राहणे आवश्यक आहे, असेही अनुप कुमार यावेळी म्हणाले.नागपूर शहर सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरात सायबर जागृती करण्यात येत असून संगणक साक्षरता आज महत्त्वपूर्ण आहे. आपली आर्थिक फसवणूक होऊनये यासाठी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. विद्यार्थी व पालकांतही जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहायक पोलीस आयुक्त विशाल माने, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, सहायक संचालक जगन्नाथ पाटील तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.आॅनलाईन शॉपिंगपूर्वी अ‍ॅपची खातरजमा करा सायबर गुन्हेगार हे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा उपयोग आर्थिक तसेच वैयक्तिक नुकसानीसाठी करीत असल्याचे सांगून आपली वैयक्तिक माहिती ही इंटरनेट तसेच हॉटेल, आॅनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर देताना संबंधित संकेतस्थळ किंवा अ‍ॅप हे अधिकृत असल्याची खात्री केल्यानंतरच व्यवहार करावेत.‘लिनक्स’ आॅपरेटिंग सिस्टिम सुरक्षित विंडोज या संगणकाच्या परिचालन यंत्रणेच्या (आॅपरेटिंग सिस्टिम) पायरेटेड व्हर्जन्स (बनावट आवृत्ती) वापरल्याने माहिती चोरी (डाटा थेफ्ट) जाण्याचा संभव बळावतो यासाठी ‘लिनक्स’ या पयार्याने सोयीस्कर व तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित अशा आॅपरेटिंग सिस्टिमचा वापर संगणक चालकांनी करावा असा सल्ला राखेजा यांनी यावेळी दिला.‘व्हर्च्युअल के्रडिट कार्ड’ वापरा ए.टी.एम., क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माहिती आधारे घडणाऱ्या सायबर गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल के्रडिट कार्ड’चा वापर केल्यास बँक ग्राहकांना संभाव्य आर्थिक नुकसान भोगावे लागणार नाही.

टॅग्स :Facebookफेसबुकnagpurनागपूर