शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:जवळील सोयाबीन बियाणे वापरताना काळजी घ्या

By admin | Updated: May 26, 2016 02:47 IST

विभागामध्ये सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून केंद्र ..

कृषी सहसंचालकांचे आवाहन : बियाणे बदलाचे प्रमाण ६० ते ६५ टक्के नागपूर : विभागामध्ये सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के पर्यंत असणे आवश्यक आहे. त्या तुलनेत नागपूर विभागातील जिल्ह्यांचे सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. हे प्रमाण किमान ३० टक्के जरी कमी केले तरी सोयाबीन उत्पादनामध्ये विशेष घट येणार नाही, असे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या सोयाबीन बियाण्यांची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व फुटलेले बियाणे/दाणे वेगळे करावे. यासाठी कृषी विभागाच्या योजनेंतर्गत ग्रामस्तरावर शेतकरी गटांना वाटप केलेल्या ‘स्पायरल सेपरेटर’चा सुद्धा वापर करता येईल. बियाणे चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक पुरेसा कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात. ज्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा व त्यावर प्रत्येकी दहा बिया (दाणे) घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात व त्या सर्व एका पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये अंकुरीत झालेल्या बिया मोजाव्यात. जर अंकुरीत झालेल्या बियांची संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के समजावी.अशा पद्धतीने सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चांगली म्हणजे ७० टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवण क्षमता ६५ टक्के असेल तर ८१ किलो बियाणे, उगवण क्षमता ६० टक्के असेल तर ८७.५ किलो बियाणे, उगवण क्षमता ५५ टक्के असेल तर ९५.५ किलो बियाणे आणि उगवण क्षमता ५० टक्के असेल तर १०५ किलो बियाणे प्रति हेक्टर क्षेत्रासाठी वापरावे.सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी करताना अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी ७५ ते १०० मि. मी. पर्जन्यमान झाल्यावरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्यांची पेरणी तीन ते चार से. मी. खोलीपर्यंत करावी, त्यापेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम अथवा दोन ग्रॅम थायरम अधिक एक ग्रॅम कार्बेन्डेझीम या औषधाद्वारे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया करावी. तसेच रायझोबियम व पी. एस. बी. या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती १० ते १५ किलो बियाण्यास प्रत्यक्ष पेरणीचे तीन तास अगोदर बीज प्रकिया करून असे प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व त्याची पेरणी करावी. (प्रतिनिधी)बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगा बियाणे खरेदी करून पेरणी करावयाची असल्यास बियाणे विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करताना पावती घेणे आवश्यक आहे. पावतीवर बियाणे उत्पादक कंपनीचे पूर्ण नाव, वाण, लॉट क्रमांक, तपशील आवश्यक आहे. बियाणे पिशवी व त्याला असलेले लेबल, खरेदी पावती पीक काढणी होईपर्यंत जपून ठेवावी. बी. बी. एफ यंत्रणेद्वारे सोयाबीनची पेरणी करावी. त्यामुळे जास्त किंवा कमी पावसाचा पिकावर कमी परिणाम होतो व पीक उत्पादनात वाढ होते. तसेच बियाणे ठराविक अंतरावर पेरल्यामुळे बियाण्यांची बचत होते, असे आवाहनही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.