शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बीबीए, बीसीएच्या प्रवेशाची पुन्हा परीक्षा, पुन्हा संधी

By निशांत वानखेडे | Updated: June 29, 2024 15:54 IST

३ जुलैपर्यंत करा ऑनलाईन अर्ज : महाराष्ट्र सीईटी सेलने जाहीर केला कार्यक्रम

नागपूर : बीबीए, बीसीए व तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय केला असून २९ जून ते ३ जुलैपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 

बीबीए व बीसीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून प्रवेश परीक्षा लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने बीबीए व बीसीए अभ्यासक्रम तांत्रिक शिक्षणाच्या गटात अंतर्भूत करून ऑल इंडिया काैन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)च्या माध्यमातून या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा लागू केली. ही परीक्षा २९ मे राेजी घेण्यात आली हाेती. मात्र ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात हा कार्यक्रम जाहीर केल्याने बहुतेक विद्यार्थी या निर्णयापासून अनभिज्ञ राहिले. त्यामुळे बहुतेकांनी परीक्षाच दिली नव्हती व ८० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली हाेती. त्यामुळे महाविद्यालयांनी एकतर परीक्षाच रद्द करण्याची किंवा पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी सरकारला केली हाेती.

 

आता महाराष्ट्र सीईटी सेलने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २९ जून ते ३ जुलै या काळात ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात सीईटी सेलच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांनी २९ मे राेजी परीक्षा दिली त्यांनाही नव्याने परीक्षेला बसता येणार आहे. दाेनदा परीक्षा देणाऱ्यांना ज्या परीक्षेत सर्वाेत्तम पर्सेंटाईल असतील, त्याच्या आधारे प्रवेश मिळणार आहेत.

 

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ४ जिल्ह्यांत जवळपास २५० महाविद्यालयांमध्ये बीबीए, बीसीएच्या ३५ ते ४० हजार जागा असण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यातही अडीच लाख जागा आहेत. यातील ८० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती हाेती. मात्र नव्याने परीक्षा हाेत असल्याने महाविद्यालयांना दिलासा मिळाल्याचे जे. डी. काॅलेजचे कार्यकारी संचालक अविनाश दाेरसटवार म्हणाले.

 

किती महाविद्यालयांनीही घेतली मान्यता?बीबीए, बीसीएचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांना एआयसीटीईकडून मान्यता घेणे आवश्यक हाेते. मात्र ५० ते ६० टक्के महाविद्यालयांनीही ती घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नव्याने मान्यता घेण्याची संधी मिळेल, याबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाnagpurनागपूर