शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात पेट्रोलपंप लुटणारा बावरी बाईकने पोहचला सुरतमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 22:13 IST

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर एक लाख रुपये लुटणारा अट्टल गुन्हेगार सागर बावरी याने बाईकनेच नागपूर ते सुरत असा पल्ला गाठला. घटनेपासूनच त्याच्या पाळतीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरील पालनपूर येथे अटक केली आहे.

ठळक मुद्देगुजरात-राजस्थान सीमेवर झाली अटक : अनेक प्रकरणात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर एक लाख रुपये लुटणारा अट्टल गुन्हेगार सागर बावरी याने बाईकनेच नागपूर ते सुरत असा पल्ला गाठला. घटनेपासूनच त्याच्या पाळतीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरील पालनपूर येथे अटक केली आहे. जुगारात कंगाल झाल्यानंतर बावरीने पेट्रोलपंप लुटला व तेथील कर्मचाºयाची हत्या केली होती. तपासणीत त्याचा सहभाग असलेल्या अनेक गुन्हेगारी घटनांचा छडा लागण्याची शक्यता आहे.वानाडोंगरी येथील हिंगणा-अमरावती आऊटर रिंग रोडवरील पेट्रोल पंपावर २१ मे रोजी बावरीने लूट केली होती. लुटीदरम्यान पंपावरील कर्मचारी पंढरी भांडारकर यांची हत्या केली आणि दुसरा कर्मचारी लीलाधर गोहते यांना गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह पाच आरोपींना बेड्या टाकल्या. मात्र, लूट घेऊन बावरी पसार झाला. एमआयडीसी येथील असलेल्या बावरीच्या जुगार अड्ड्यावरच या लुटीची योजना आखण्यात आली होती आणि घटनेनंतर तो पुन्हा त्याच अड्ड्यावर गेल्याची माहिती ‘लोकमत’ने उजागर केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांमध्ये खळबळ माजली होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यास सुरुवात केली. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बावरी घटनेनंतर बाईकवर सुरत येथे पोहचला आणि तेथून ट्रकमध्ये बसून गुजरात व राजस्थान सीमेवर असलेल्या पालनपूर येथे पोहोचला. तेथून तो राजस्थानला जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान, एमआयडीसी पोलीस सुरतला पोहचले. तेथे पालनपूरमध्ये एक गुन्हेगार लपून बसल्याची माहिती मिळताच पालनपूर पोलिसांच्या सहयोगाने बावरीला अटक करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी त्याला घेऊन पोलीस नागपूरला पोहोचले. देशात टाळेबंदी आहे आणि लाखोंच्या संख्येने मजूरवर्ग पायी अथवा मिळेल त्या साधनाने आपल्या गंतव्य स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच मजुरांच्या आडोशाखाली बावरी बाईकने सुरतला पोहचला होता. विशेष म्हणजे याच बावरीने सुपारी घेऊन प्रा. मोरेश्वर वानखेडे यांची हत्या केली होती. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. बावरीचा गुन्हेगारी जगतात मोठा वावर असून, तो एमआयडीसी येथील काही जुगार अड्ड्याशीही जुळलेला होता. त्याच्या नावावर अनेक गंभीर घटनांची नोंद आहे.बावरी मस्त, पोलीस भुकेने त्रस्तएकीकडे बावरी प्रवासी मजुरांच्या आडोशाखाली पळून जाण्याच्या बेतात यशस्वी होत होता आणि त्याच्या मागावर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. नागपूर ते पालनपूर हे अंतर अकराशे किमी एवढे आहे शिवाय टाळेबंदीने कसलीच सुविधा नाही. त्यामुळे, पोलिसांना मार्गात भूक आणि तहानेचा सामना करावा लागला. मजुरांसाठी असलेल्या शिबिरात जेवण किंवा चहा-नाश्त्यावरच भूक भागवावी लागत होती. बावरीला अटक केल्यानंतर तर पोलिसांची जबाबदारी आणखीनच वाढली. त्यामुळे, नागपूरला पोहचेपर्यंत पोलिसांना डोळ्याची पापणीही हलवता येईना, अशी स्थिती होती.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपRobberyचोरीArrestअटक