शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पिंपळ, तुळस, कडुलिंब रात्रीही सोडतात ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:16 IST

Environment, Trees, Oxygen पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अ‍ॅलोवेरा, कृष्णकमळ आणि काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो.

ठळक मुद्देकाही झाडांमध्ये अधिक क्षमतावातावरणातील विषारी वायू शोषणाचेही गुणधर्म

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्री झाडाखाली झोपू नये असे म्हणतात कारण झाडे रात्री कॉर्बन डायऑक्साईड सोडतात. मात्र गौतम बुद्ध अनेक वर्षे पिंपळाच्या झाडाखाली कसे बसले, हा प्रश्न पडतो. ते बसू शकले कारण पिंपळ वृक्ष रात्रीसुद्धा प्राणवायू सोडतो. पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अ‍ॅलोवेरा, कृष्णकमळ आणि घरासमोरील कुंड्यामध्ये ठेवलेल्या काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो.वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नानासाहेब उगेमुगे यांनी अशा विविध झाडांची अभ्यासपूर्ण नोंद ठेवली आहे. आपल्या संस्कृतीत तुळशीला कित्येक शतकांपासून महत्त्व आहे ते याचमुळे. कडुलिंबामध्येही औषधी गुणधर्म आहेत. याशिवाय अ‍ॅलोवेरा, कृ ष्णकमळ, अ‍ॅरिका पॉम यांच्यासह कुंड्यात वाढणारे मनी प्लॅन्ट, साप घरात येऊ नये म्हणून लावले जाणारे स्रेक प्लॅन्ट, रबर प्लॅन्ट, जरबेरा, स्पायडर प्लॅन्ट, लॅव्हेंडर, कुंडीतील बांबू प्लॅन्ट, पीस लिली, ड्रासेना, आर्किड, जास्मीन आदी झाडांचा समावेश आहे. फोटोसिन्थेसीस प्रक्रियेद्वारे दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषून आपले अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. रात्री श्वासोच्छ्वास करताना मात्र ऑक्सिजन घेऊन कार्बन सोडतात. मात्र वर उल्लेखिलेली झाडे रात्रीसुद्धा ऑक्सिजन सोडतात किंवा त्यांच्यात प्राणवायू सोडण्याची क्षमता अधिक असते. वाळवंटात पाण्याची कमतरता असलेल्या भागातील वृक्षांमध्येही हा गुणधर्म आढळून येत असल्याचे डॉ. उगेमुगे यांनी सांगितले.

रात्री प्राणवायू सोडण्याच्या क्षमतेबाबत वैज्ञानिकांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र या वनस्पती अतिशय लाभदायक आहेत. वातावरणातील विषारी वायू शोषण्याचा गुणधर्म त्यांच्यात आहे. शिवाय प्राणवायू सोडत असल्याने प्रतिकार शक्ती वाढविण्यासही लाभदायक आहेत.- डॉ. नानासाहेब उगेमुगे, वनस्पतीतज्ज्ञ

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषण