शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बडोदा संमेलनापूर्वी ‘अभिजात’बाबत कृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 15:49 IST

बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पत्र : सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकसंध होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास व पंतप्रधानांनी अविलंब मराठीला अभिजात दर्जा दिल्यास केंद्र व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव आम्हाला येत्या साहित्य संमेलनात मांडता येईल, असेही जोशींनी या पत्रात नमूद केले आहे. विनंत्या, आर्जव खूपदा करून झालेत. परंतु अद्याप काही या विषयावर तोडगा निघाला नाही. मागच्या वर्षी डोंबिवलीत पार पडलेल्या संमेलनातही मुख्यमंत्र्यांसमोर ही मागणी करण्यात आली होती. परंतु वर्ष लोटले पुढे काहीच झाले नाही. यंदाचे संमेलन पंतप्रधानांच्या गृहराज्यात होत आहे. हा योग साधून केंद्राने मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.मराठी विद्यापीठाची घोषणाही होऊ द्यामराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारच्या अख्त्यारितील आहे. त्यामुळे त्याला विलंब होणे समजून घेता येईल. परंतु मराठी विद्यापीठाचा विषय तर पूर्णपणे राज्य शासनाच्या अधिकारातील आहे. महाराष्ट्रात मराठीची होणारी ही प्रतारणा थांबवून राज्य शासनाने यंदाच्या साहित्य संमेलनापूर्वी मराठी विद्यापीठ निर्मितीची घोषणा करावी, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूर