शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

आंबे पिकविण्यासाठी अजूनही होतोय प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 6, 2024 20:27 IST

रसायनाने पिकलेले आंबे आरोग्यासाठी घातक : सरकारची एथिलीन रिपनरच्या वापराला परवानगी

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) संथ कारवाईमुळे यंदाच्या हंगामात कळमन्यातील फळे व्यापारी आंबे पिकविण्याठी प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा सर्रास उपयोग करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) तीन वर्षांआधी अधिसूचना काढून फळे पिकविण्यासाठी एथिलीन रिपनर रसायनाच्या वापराला अधिकृत परवानगी दिली आहे. या रसायनाने आंबे उशिरा पिकतात. त्यामुळेच झटपट नफा कमविण्यासाठी पर्याय म्हणून कळमन्यातील व्यापारी पुन्हा प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडकडे वळले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने कळमन्यात या रसायनाचा सर्रास उपयोग होत असल्याचे व्यापाऱ्यांनी खासगीत सांगितले. दुसरीकडे कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा उपयोग आता बंद झाल्याचे एफडीएच्या अधिकारी सांगतात. अर्थपूर्ण व्यवहारामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा ग्राहक पंचायतचा आरोप आहे.

एथिलीन रिपनरने दोन दिवसातच पिकतात आंबेभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडऐवजी एथिलीन रिपनर रसायनाचा उपयोग होऊ लागला. या रसायनाने दोन दिवसातच आंबे पिकतात. पाऊच स्वरुपात चीन देशातून आलेले हे रसायन ओले करून आंब्याच्या पेटीत ठेवतात. या रसायनाचा आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे सरकारचे मत आहे. पण सरकारचा दावा खरा नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यापारी नफा कमविण्यासाठी आधीही प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग करायचे. आता त्याऐवजी सरकारमान्य दुसरे रसायन आले आहे. शेवटी मानवी आरोग्याशी खेळ होतोच.

केवळ दोन पाऊचने आंब्याची पेटी पिवळीधम्मसध्या आंब्याचा हंगाम आहे. सर्वच प्रकारचे आंबे कळमन्यात विक्रीसाठी येत आहेत. सध्या आवक वाढली आहे. त्यामुळे आंबे पिकविण्यासाठी रसायनाचा उपयोग होत आहे. याआधीही विकलेले आंबे कोणत्या रसायनाने पिकविले होते, याची माहिती विभागाकडे नाही. शिवाय किती कारवाऱ्या झाल्या, याचीही नोंद नाही. या रसायनाबाबत अधिकारी अनभिज्ञ आहेत. पिकलेल्या आंब्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यास आंब्यात रसायन असल्याचे निष्पन्न होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच आंबे जपून खावेत, असा सल्ला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर