शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बँक कर्मचाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा

By admin | Updated: November 19, 2016 03:08 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमधील काम प्रचंड वाढले आहे.

मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला : आनंदी राहून काम करानागपूर : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमधील काम प्रचंड वाढले आहे. लोकांची गर्दी सांभाळत पैशांचा व्यवहार करण्याच्या या जोखमीच्या कामाला तोंड देताना बँकेचे कर्मचारी प्रचंड तणावाखाली आले आहेत. यातून अनेकांना आजार वाढले असून काही मृत्यूलाही सामोरे जात आहे, अशावेळी बँक अधिकाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा, आनंदी राहून काम करा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.बँकेतील कर्मचारी नियमित वेळेच्या तासभर आधीपासून ते रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त आहेत. दिवसभर रांगांमध्ये लागणाऱ्या नागरिकांना नोटा बदलून द्यायच्या किंवा त्यांचे पैसे जमा करून घ्यायचे व सायंकाळी व्यवहार बंद झाल्यानंतर खर्चाचा ताळेबंद करणे असा दिनक्रम सुरू आहे. यातच अनेक बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे. परिणामी, मनावर याचा तणाव निर्माण होणे अपरिहार्य आहे. परंतु तणावावर नियंत्रण आणण्याचे कौशल्य आपल्याला अवगत झाले पाहिजे तरच पुढील आयुष्य आनंदात घालवता येईल, असे मत केईएम हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंधडा यांचे आहे. ते म्हणाले, कामाची चिंता करीत विविध रोगांना आमंत्रण देण्यापेक्षा त्याचे नियोजन करण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे. सकारात्मक विचार मनात असला की तणाव निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. धावपळीच्या या युगात मनासारखे काम झाले नाही तर मानसिक ताण वाढतो. म्हणून तणावाचा निचरा होणे आवश्यक आहे. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आकस्मिक घडणाऱ्या घटनांकडे शांत चित्ताने पहा. आधी काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले, तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. कामात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. बँक कर्मचाऱ्यांचे काम हे जोखमीचे असलेतरी त्यांनी वैयक्तिक घेऊ नये. हे काम देशाचे आहे, सार्वजनिक हिताचे आहे असे समजून घेणे आवश्यक आहे. आनंदाने कामाला सामोर जा. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)