शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बांगलादेशी आयात शुल्काने पिळला नागपुरी संत्रा; रोजची निर्यात २०० ट्रकवरून २५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 08:30 IST

Nagpur News आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे.

ठळक मुद्दे प्रती टन १५ हजार रुपयांनी भाव गडगडले

कमलेश वानखेडे

नागपूर : आंबट गोड चवीसाठी नागपूर-विदर्भातील संत्रा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवून प्रती किलो तब्बल ६३ रुपये केले आहे. याचा जबर फटका निर्यातीला बसला असून, यामुळे संत्र्यांची उचल कमी झाली आहे. परिणामी संत्र्याचे भाव गडगडले आहेत. ऑक्टोबर महिन्यात २५ ते ४० हजार रुपये प्रती टनाने विकल्या जाणाऱ्या संत्र्याचे भाव २० ते २५ हजार रुपये टनांपर्यंत खाली आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसतो आहे.

विदर्भातील वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो. विदर्भातील एकूण संत्रा उत्पादनाच्या सुमारे ३५ टक्के संत्र्याची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे. गेल्यावर्षी विदर्भातील दररोज सुमारे २०० ट्रक संत्र्याची बांग्लादेशला निर्यात व्हायची. एका ट्रॅकमध्ये साधारणत: २५ ते २७ टन संत्रा असतो. गेल्यावर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्रा बांगलादेशला निर्यात करण्यात आला. मात्र, यावर्षी बांगलादेशकडून संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ५१ रुपये प्रती किलो असलेले आयात शुल्क यावर्षी वाढवून ६३ रुपये करण्यात आले. गेल्या तीन वर्षांत आयात शुल्कात तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून संत्र्याची उचल कमी झाली असून, दररोज जेमतेम २० ते २५ ट्रकच माल निर्यात केला जात आहे. यामुळे संत्र्यांचे भाव गडगडले आहेत.

देशांतर्गत साठा वाढला, भाव पडले

- विदर्भातील संत्रा नागपुरातील कळमना मार्केटसह कोलकाता, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, बंगलोरमध्ये विकला जातो. मात्र, निर्यात कमी झाल्याने या देशांतर्गत बाजारपेठांमध्येही संत्र्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गतही संत्र्यांची उचल घटली आहे. परिणामी भाव टनामागे १५ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत.

केंद्र सरकारने दखल घ्यावी

- गेल्या तीन वर्षांत बांगलादेशने संत्र्यांवरील आयात शुल्क तिप्पट केले. यावर्षी ऐन हंगामात पुन्हा वाढ केली. याचा परिणाम निर्यातीवर होत असून, संत्र्याचे भाव गडगडले आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे संत्रा गळाला. उत्पादन घटले. आता वाढीव आयात शुल्कामुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांवर दुहेरी मार पडत आहे. केंद्र सरकारने त्वरित याची दखल घेत बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची गरज आहे.

- मनोज जवंजाळ

- संचालक, महाऑरेंज

 

बांगलादेशने असे वाढविले आयात शुल्क

२०१९ - २० रुपये

२०२० - ३० रुपये

२०२१ - ५१ रुपये

नोव्हेंबर २०२२ - ६३ रुपये

टॅग्स :fruitsफळे