शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

बॅण्ड, बाजा, वरात... सर्वच ठप्प! ;  वाद्यवृंदांवर बेरोजगारीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 8:55 PM

विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदहा ते १२ कोटींचा व्यवसाय बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना नावाच्या संकटो जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्याचे दुष्परिणाम हळूहळू पुढे यायला लागले आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रावर या महामारीची मार बसली असून, बेरोजगारी व व्यवसाय बुडीचे संकट निर्माण झाले आहे. विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.साधारणत: दिवाळीत तुळशीविवाह आटोपले की विवाह मुहूर्त काढले जातात. आपल्याकडील वातावरणीय स्थिती बघता, कृषी व्यवसायातील उसंत बघता आणि शाळा-कॉलेजेसच्या परीक्षांचा विचार करता बहुतांश विवाह सोहळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होत असतात. एका दिवसाला एकाच शहरात हजारावर विवाह सोहळे होत असल्याचे चित्रही बघण्यात आले आहे. मंगलकार्यालय उपलब्ध नाहीत म्हणून देवळांमध्येच असे विवाहसोहळे उरकले गेल्याचेही वेळोवेळी बघण्यात आले आहे. विवाहसोहळा म्हणजे दोन कुटूंबीयांच्या नात्यांचा मजबूत बंध असण्यासोबतच अनेक रोजगारही देणारे ठरतात. त्यातील प्रमुख भाग म्हणजे बॅण्डपथकांचा असतो. नवरदेवाची वरात बॅण्ड, बाजा किंवा संदलच्या गजरात काढली जाते. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असल्याने, बॅण्डपथक या प्रसंगाला संस्मरणीय करत असतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊनची स्थिती निर्माण होताच अनेक अनेक विवाह सोहळे स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. १५ एप्रिलपर्यंतचे जवळपास सगळेच सोहळे पुढील अनुकुल स्थिती निर्माण होईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. अशा स्थितीत याच विवाहसोहळ्यांच्या भरवशावर जिवनयापन करणारे बॅण्डपथक बेरोजगारीशी भांडत असल्याचे चित्र आहे. नागपुरात साधारणत: लहान-मोठे मिळून १२ हजार वादक आहेत. या वादकांचे वेगवेगळे ग्रुप असून, या काळात हे बॅण्डपथक अतिशय व्यस्त असतात. दिवसाला तीन ते चार विवाहसोहळ्यांत त्यांचे वादन होत असते आणि हजारो रुपये कमावून घरी जात असतात. साधारणत: या काळात बॅण्डपथक व वाद्यवृंदांचा १२ ते १५ कोटी रुपयांचा व्यवसाय होत असतो. तो बुडाला असून, लॉकडाऊनमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनचा काळ आणखी वाढला तर कसे होईल, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.कोरोनाने सगळेच हिरावले, मदतीची गरज - लहानू इंगळे: हे तीन ते चार महिने बॅण्डपथक व वाद्यवृंदांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात संपूर्ण वर्षभराची कमाई होत असते. मात्र, नेमक्या याच महिन्यांत कोरोनाचे सावट निर्माण झाले आणि लॉकडाऊनमुळे आमचा धंदाच चौपट झाल्याची वेदना नागपूर बॅण्ड असोसिएशनचे सचिव लहानू इंगळे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कमाईचे नेमके महिने कोरडे जात असल्याने, वर्षभर अत्यंत बिकट स्थितीचा सामना वादकांना करावा लागणार आहे. अशा स्थितीत सरकारने आम्हा बॅण्डपथक व वाद्यवृंदांना मदत करणे गरजेचे असल्याची भावना इंगळे यांनी व्यक्त केली.१४०० पथक: शहरात नोंदणीकृत बॅण्डपथकांची संख्या ११० आहे आणि छोटे व मध्यम बॅण्ड पथक, संदल, पंजाबी ढोल व इतर पथकांची संख्या १३००च्या जवळपास आहे. प्रत्येक पथकात १० ते २० संख्येने वादकांची संख्या असते. हे पथक एका तासाच्या वादनासाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत आकारणी करत असते. साधारणत: एकाच दिवसात तीन ते चार वादनाच्या कार्यक्रमातून ८० हजार ते १ लाख २० हजारापर्यंतची कमाई होत असते. कमाईचा काळ हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचाच असतो. जूनपासून पावसास सुरुवात होत असल्याने कमाई बंद असते. नेमक्या कमाईच्या काळातच धंदा चौपट झाल्याने बॅण्डपथक व वाद्यवृंद तणावात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस