शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रजा अकादमीसह विहिंप, बजरंग दलावरही बंदी घाला : तारीक अन्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 10:42 IST

भाजपकडे सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करू लागले आहेत. देशात दंगे करा अन् मत मिळवा, हाच भाजपचा आजवरचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे, असे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दंगे घडवून आणणाऱ्यांवर बंदी घातलीच पाहिजे. रजा अकादमीवर बंदी घालाच; परंतु विश्व हिंदू परिषद व बजरंग दलावरही बंदी घालण्यात यावी, असे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.

लोकतंत्र बचाव या कार्यक्रमासाठी ते रविवारी नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उपस्थित होते. तारीक अन्वर म्हणाले, भाजपकडे सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करू लागले आहेत. देशात दंगे करा अन् मत मिळवा, हाच भाजपचा आजवरचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे.

पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे नाईलाजास्तव केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती किंचितशा कमी केल्या. परंतु त्याने होणार नाही. २०१४ च्या पूर्वी ज्या किमती होत्या. त्या किमतीपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किमती कराव्यात, असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, माजी आमदार वीरेंद्र जगताप व माजी मंत्री अनिस अहमद प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न - नाना पटोले

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राला बदनाम करीत असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश बिहारमध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याच यांना सुचत असतं. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात पडत आहेत. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे; मात्र आता हिंदू आणि मुस्लीम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत परत येण्याचे स्वप्न आता सकाळीही पडू लागले असल्याची टीकाही त्यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भाजपचे आंदोलन आहे. भाजपची यात दुटप्पी भूमिका आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती या केंद्राने ६० रुपयांनी कमी करायला हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस