शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

बांबू उत्पादनाचा सहकार क्षेत्रात समावेश व्हावा; पाशा पटेल यांची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 12:48 IST

इथेनॉल, दगडी कोळसा, कापडा, फ्लोरिंगसह तब्बल १८०० वस्तू या बांबूपासून तयार होतात, त्यामुळे देशात बांबूची मागणी वाढणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पीक न घेता बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना बांबू लावण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बांबूपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या प्रत्येक जिल्ह्यात रिफायनरी उभारता येऊ शकते. परंतु हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, सहकारातूनच हे काम शक्य आहे. त्यामुळे बांबूचा समावेश सहकार क्षेत्रात करावा, अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी यावर सविस्तर चर्चाही केली आहे. ही मागणी मान्य झाली तर देशभरात बांबूच्या ३०० रिफायनरी निर्माण होऊ शकतात, असे भाजप नेते व माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

इथेनॉल, दगडी कोळसा, कापडा, फ्लोरिंगसह तब्बल १८०० वस्तू या बांबूपासून तयार होतात, त्यामुळे देशात बांबूची मागणी वाढणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पीक न घेता बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पाशा पटेल यांनी यावेळी बांबूपासून होणाऱ्या कमाईचे गणितच मांडले. ते म्हणाले, ‘ऊस, कापूस यापासून २०-२५ हजारांपेक्षा जास्त उरत नाही; परंतु बांबू लावला तर दोन लाख रुपये उरतात. एक एकर शेतात बांबूची २०० झाडे लावता येतात. एक झाड ३५ रुपयाला पडते. जवळपास एक एकरातून ५० टन बांबू निघतो. ५१०० रुपये टन असा भाव आहे, त्यामुळे जवळपास अडीच लाख रुपये एका एकरातून मिळतात. ५० हजार रुपये खर्च धरला तरी एका एकरातून निव्वळ कमाई दोन लाख रुपये मिळू शकते.

उसापासूनही इथेनॉल तयार होते; परंतु त्यात पाणी भरपूर लागतं. त्याऐवजी बांबूला पाणी कमी लागतं आणि उत्पादन अधिक होते. तसेच माणसाला २८० किलो ऑक्सिजन लागतो. बांबूचं झाड ३२० किलो ऑक्सिजन देतं. बांबू हा ३० टक्क्यांपेक्षा अधिक कार्बन खातं. म्हणून पाणी बचत आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठीसुद्धा बांबूची लागवड आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत भाजप नेते अशोक मानकर, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी