शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मतपत्रिकाच पारदर्शक व परवडणारी

By admin | Updated: April 19, 2017 02:42 IST

देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

राजकुमार तिरपुडे : मतदाराचा अविश्वास दूर करावा नागपूर : देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. हा वाद बाजूला ठेवून निवडणूक खर्चाचा विचार केल्यास ईव्हीएमपेक्षा मतपत्रिकेचा वापर कमी खर्चात होतो. शिवाय यामुळे निवडणूक पारदर्शी होते. त्यामुळे मतपत्रिकेचा वापरच योग्य आहे, असे मत विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तिरपुडे म्हणाले, नाागपूर महापालिकेत ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ईव्हीएमचा वापर केल्यामुळे एका प्रभागात सुमारे ६४ लाख रुपये खर्च आला. हीच निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली असती तर फक्त ४० हजार रुपये खर्च आला असता. प्रत्येक बूथवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. एका ईव्हीएमची किंमत २० हजार रुपये आहे. एका बुथवर चार मशीनचा वापर झाला. त्यानुसार एका बूथवर ८० हजार रुपये खर्च झाला. एका प्रभागात सरासरी ८० बुथ होते. त्यानुसार एका प्रभागात फक्त मतदानावर ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. शिवाय एक ईव्हीएम जास्तीत जास्त १० वर्षे वापरता येते. त्यापुढे त्याचा वापर करणे सुरक्षित मानले जात नाही, असे कायदा मंत्र्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे एक ईव्हीएम तीन ते चार निवडणुकीतच कामी येऊ शकते. त्या तुलनेत मतपत्रिकेचा वापर केला तर कमी खर्चात काम होते. मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यामुळे आपण ज्याला मत दिले त्यालाच ते मिळाले असल्याची मतदाराला खात्री पटते. यावर शंका घेण्यास कुठलीही शक्यता उरत नाही. सध्या देशात ईव्हीएमवर अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अशात मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास वाढविण्याची तसेच लोकशाही अधिकळ बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला बाबा कोंबाडे, जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)