शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

मतपत्रिकाच पारदर्शक व परवडणारी

By admin | Updated: April 19, 2017 02:42 IST

देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

राजकुमार तिरपुडे : मतदाराचा अविश्वास दूर करावा नागपूर : देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. हा वाद बाजूला ठेवून निवडणूक खर्चाचा विचार केल्यास ईव्हीएमपेक्षा मतपत्रिकेचा वापर कमी खर्चात होतो. शिवाय यामुळे निवडणूक पारदर्शी होते. त्यामुळे मतपत्रिकेचा वापरच योग्य आहे, असे मत विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तिरपुडे म्हणाले, नाागपूर महापालिकेत ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ईव्हीएमचा वापर केल्यामुळे एका प्रभागात सुमारे ६४ लाख रुपये खर्च आला. हीच निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली असती तर फक्त ४० हजार रुपये खर्च आला असता. प्रत्येक बूथवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. एका ईव्हीएमची किंमत २० हजार रुपये आहे. एका बुथवर चार मशीनचा वापर झाला. त्यानुसार एका बूथवर ८० हजार रुपये खर्च झाला. एका प्रभागात सरासरी ८० बुथ होते. त्यानुसार एका प्रभागात फक्त मतदानावर ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. शिवाय एक ईव्हीएम जास्तीत जास्त १० वर्षे वापरता येते. त्यापुढे त्याचा वापर करणे सुरक्षित मानले जात नाही, असे कायदा मंत्र्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे एक ईव्हीएम तीन ते चार निवडणुकीतच कामी येऊ शकते. त्या तुलनेत मतपत्रिकेचा वापर केला तर कमी खर्चात काम होते. मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यामुळे आपण ज्याला मत दिले त्यालाच ते मिळाले असल्याची मतदाराला खात्री पटते. यावर शंका घेण्यास कुठलीही शक्यता उरत नाही. सध्या देशात ईव्हीएमवर अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अशात मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास वाढविण्याची तसेच लोकशाही अधिकळ बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला बाबा कोंबाडे, जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)