शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

दोन वर्षांपूर्वी विकली गेली नागपुरातील ‘बालिका वधू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 20:48 IST

लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे.

ठळक मुद्देनवरदेवासह टोळीच्या तीन सदस्यांना अटक आर्थिक परिस्थितीमुळे अल्पवयीन मुलीने सोडले होते घर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना पकडले आहे. पंकज हनुमान आपतुरकर (३०) रा. भवानीनगर पारडी, श्यामलाल रामकिसन गुजर (३३) आणि सुरेंद्र जगन्नाथ चौधरी (२७) झालावाड, कोटा राजस्थान अशी आरोपीची नावे आहे. पंकज आॅटो चालक आहे.पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अजनी येथील रामटेकेनगरात राहते. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहे. आई मजुरी करते. आर्थिक परिस्थितीमुळे घरात नेहमी वाद होत होते. डिसेंबर २०१६ मध्ये आईसोबत तिचे असेच भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली होती. या दरम्यान तिची पंकजसोबत ओळख झाली. पंकज मानवी तस्करीच्या आंतरराज्यीय टोळीचा सदस्य आहे. त्याने पीडित अल्पवयीन मुलीची मानसिक अवस्था ओळखली. त्याने तिला चांगल्या कुटुंबात लग्न किंवा नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. तो तिला एका महिला दलालाकडे घेऊन गेला. तिने एक-दोन दिवस तिला आपल्या घरी ठेवले. याचदरम्यान पंकजने मध्यप्रदेशातील एका दलालाशी संपर्क केला आणि त्याच्याकडे पीडित मुलीला सोपविले. मध्यप्रदेशातील दलाल तिला राजस्थानला घेऊन गेला. तिथे या मुलीला श्यामलाल गुजर नावाच्या व्यक्तीला विकले. श्यामलालने तिला सुरेंद्र चौधरी नावाच्या व्यक्तीला एक लाख रुपयात विकले. सुरेंद्रने बोगस दस्तावेजाच्या मदतीने तिच्याशी लग्न केले आणि तिला आपल्या घरी बंधुआ मजूर म्हणून ठेवले. तिला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते. सुरेंद्रचे कुटुंबीय तिच्यावर पाळत ठेवायचे. तिच्या हाती मोबाईलही लागू दिले जात नव्हते. काही दिवसांपूर्वी तिला गावातील शाळेच्या शिक्षकाला मोबाईल मागून कुटुंबीयांशी बोलावे, अशी युक्ती सुचली. पीडित मुलीने शाळेत पोषणआहार बनवणाऱ्या महिलेसोबत काम करण्याच्या बहाण्याने शाळेत जाण्याचे ठरविले. तिने सुरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना शाळेत जाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरेंद्रनेही परवानगी दिली. गेल्या आठवड्यात शाळेत जाताच तिने शिक्षकाला कुटुंबीयांशी बोलण्यासाठी मोबाईल मागितला. शिक्षकानेही तिला आपला मोबाईल दिला. तेव्हा तिने आपल्या आईला फोन करून आपबिती सांगितली.अजनी पोलिसांनी प्रकरण ‘एएचटीयू’ला सोपविलेअल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने केलेल्या तक्रारीनुसार अजनी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अपहृत मुलीची माहिती मिळत नसल्याने त्यांनी चार महिन्यानंतर हे प्रकरण अ‍ॅण्टी ह्युमन ट्रॅफीकिंग युनिट (एएचटीयू) ला स्थानांतरित केले होते. एएचटीयू गुन्हे विभागाची एक शाखा आहे. मीना जगताप या शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईने जगताप यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर तपास सुरू केला. ते शाळेजवळ पोहोचले आणि अल्पवयीन मुलीला शोधून काढले. तिला मुक्त करून कथित पती सुरेंद्र चौधरीला अटक केली. त्याच्या माहितीवरून श्यामलाल गुजर आणि पंकज आपतुरकरलाही पकडले.पूर्ण कुटुंब बर्बाद झालेअल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. तिचा कुठलाही पत्ता लागत नसल्याने तिच्या भावाने दु:खी होऊन आत्महत्या केली. तिच्या आईची मानसिक अवस्थाही बिघडली. या घटनेने पूर्ण परिवार प्रभावित झाला. मुलीचे काय झाले असेल या विचारात तिची आई नेहमी असायची. ती मिळाल्यावर खरा प्रकार लक्षात आला.लोकमतने केला होता खुलासालोकमतने १२ डिसेंबर रोजीच्या अंकात दोन लाखात मिळते वधू या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तातून नागपुरातील अल्पवयीन मुली व महिलांना राजस्थानमध्ये विकले जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. ताज्या प्रकरणाने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रानुसार राजस्थानमध्ये मोठ्या संख्येने शहरातील अल्पवयीन मुलींना विकले जात असून त्यांचे शोषण केले जात आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHuman Traffickingमानवी तस्करी