शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग आणि अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST

हार्दिक रॉय नागपूर : २ डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८४ साली ...

हार्दिक रॉय

नागपूर : २ डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८४ साली याच दिवशी मध्य प्रदेशामध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. ही देशातील सर्वात वाईट औद्योगिक दुर्घटना ठरली ज्यामध्ये ३७०० च्यावर नागरिकांनी आपले प्राण गमावले. कीटनाशकांच्या युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या कंपनीत ही दुर्घटना घडली होती. मिथिल आयसोसायनाईड वायूची गळती झाल्याने ५ लाखावर नागरिक प्रभावित झाले होते. लोकमतने पर्यावरण संशोधक व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून येणाऱ्या काळात काय उपाययोजना आखता येईल, याबाबत माहिती घेतली.

नीरीच्या हवामान निर्भरता आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख आणि प्रमुख वैज्ञानिक डॉ जे. एस. पांडे म्हणाले, ही दुर्घटना जगातील सर्वात वाईट औद्योगिक दुर्घटना होती. आर्थिक नुकसान तर झालेच पण हानिकारक वायूमुळे झालेली मानवी हानी दुःखदायक होती. अशा दुर्घटना कित्येक पिढ्या प्रभावित करतात. यावर नियंत्रणासाठी इंडस्ट्रीयल कमर्शियल ॲग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड रेसिडेंसियल ॲक्टिव्हिटी (आयसीइएफआर) समुद्र किनाऱ्याचे समतोल संशोधनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी लागेल. ते राज्य स्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर आकडे गोळा करून करावी लागेल. हे आकडे गरजेचे आहेत कारण सर्व वैज्ञानिक, आर्थिक आणि औद्योगिक विकास पर्यावरणातूनच होत असतो. त्यामुळे स्रोतांचा धोरणात्मक व विकासात्मक उपयोग होणे आवश्यक आहे. हा समतोल सध्या दिसत नाही. शहरालगतची मोठी जमीन विकास कामांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ही जमीन आर्थिक कामासाठी आणि पर्यावरणाच्या कामात उपयोगी आणणे शक्य आहे. कोविड सारखी स्थिती लक्षात घेत अशा जमिनीच्या समतोल विकासासाठी कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.

इंटरनेटमुळे सध्याची पिढी जागरूक आहे आणि जबाबदारही आहे. त्यामुळे शालेय स्तरावर त्यांना पर्यावरणाविषयी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे डॉ पांडे म्हणाले. त्यासाठी शाळेत पर्यावरणसंबंधी उपक्रम घेणे गरजेचे असून त्याची तीव्रता वाढवावी लागेल. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे. पर्यावरणासोबत अर्थव्यवस्था समजणे अधिक लाभदायक असल्याचे त्यांना कळायला हवे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण कृती अकॅडमीचे माजी संचालक मनीष रंजन म्हणाले, कोविडमुळे सध्या वापरात असलेले मास्क आणि सॅनिटायझरचे नियम पालन हा आपल्या जीवनाचा भाग व्हायला हवा. आपल्या पूर्वीची पिढी चांगल्या आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पालन करण्यात कठोर होती आणि ही संस्कृती आपण विसरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपत्ती केवळ नैसर्गिक नसते तर मनुष्य निर्मितही असते. भोपाळ गॅस दुर्घटना ही औद्योगिक होती आणि आजच्या काळात अशाप्रकारे दुर्घटना घडली तर त्याची लोकसंख्येमुळे हानी अतिशय भयानक असेल. एनडीआरएफ टास्क फोर्सची स्थापना आपत्ती व्यवस्थापन करण्यासह जागृती आणि सजगता निर्माण करण्यासाठी झाली आहे. कोरोना ही सुद्धा जैविक आपत्ती असून संसर्गजन्य असल्याने मास्क वापरणे गरजेचे आहे. हा मास्क आपल्याला इतर विषाणू, जिवाणू आणि वाहन व औद्योगिक निघणाऱ्या प्रदूषणापासूनही सुरक्षित करतो. त्यामुळे त्यांचा उपयोग स्मार्टपणे आणि नियमित करणे आवश्यक आहे.

आपत्ती ही मानवाच्या नियंत्रणात नाही पण त्यासाठी तयार राहणे आपल्या हातात आहे. म्हणून पूर्व नियंत्रण राखणे समजून घेणे गरजेचे आहे. प्राथमिक सुरक्षा पालन करण्यासह प्रदूषणाचे आणि आजारांचे प्रकार, आपल्या कृतीचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्यविषयक पूर्वनियोजन कृती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत रंजन यांनी व्यक्त केले.