शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

निसर्ग आणि अर्थव्यवस्थेचा समतोल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST

हार्दिक रॉय नागपूर : २ डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८४ साली ...

हार्दिक रॉय

नागपूर : २ डिसेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८४ साली याच दिवशी मध्य प्रदेशामध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. ही देशातील सर्वात वाईट औद्योगिक दुर्घटना ठरली ज्यामध्ये ३७०० च्यावर नागरिकांनी आपले प्राण गमावले. कीटनाशकांच्या युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या कंपनीत ही दुर्घटना घडली होती. मिथिल आयसोसायनाईड वायूची गळती झाल्याने ५ लाखावर नागरिक प्रभावित झाले होते. लोकमतने पर्यावरण संशोधक व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून येणाऱ्या काळात काय उपाययोजना आखता येईल, याबाबत माहिती घेतली.

नीरीच्या हवामान निर्भरता आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख आणि प्रमुख वैज्ञानिक डॉ जे. एस. पांडे म्हणाले, ही दुर्घटना जगातील सर्वात वाईट औद्योगिक दुर्घटना होती. आर्थिक नुकसान तर झालेच पण हानिकारक वायूमुळे झालेली मानवी हानी दुःखदायक होती. अशा दुर्घटना कित्येक पिढ्या प्रभावित करतात. यावर नियंत्रणासाठी इंडस्ट्रीयल कमर्शियल ॲग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड रेसिडेंसियल ॲक्टिव्हिटी (आयसीइएफआर) समुद्र किनाऱ्याचे समतोल संशोधनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी लागेल. ते राज्य स्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर आकडे गोळा करून करावी लागेल. हे आकडे गरजेचे आहेत कारण सर्व वैज्ञानिक, आर्थिक आणि औद्योगिक विकास पर्यावरणातूनच होत असतो. त्यामुळे स्रोतांचा धोरणात्मक व विकासात्मक उपयोग होणे आवश्यक आहे. हा समतोल सध्या दिसत नाही. शहरालगतची मोठी जमीन विकास कामांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ही जमीन आर्थिक कामासाठी आणि पर्यावरणाच्या कामात उपयोगी आणणे शक्य आहे. कोविड सारखी स्थिती लक्षात घेत अशा जमिनीच्या समतोल विकासासाठी कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.

इंटरनेटमुळे सध्याची पिढी जागरूक आहे आणि जबाबदारही आहे. त्यामुळे शालेय स्तरावर त्यांना पर्यावरणाविषयी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे डॉ पांडे म्हणाले. त्यासाठी शाळेत पर्यावरणसंबंधी उपक्रम घेणे गरजेचे असून त्याची तीव्रता वाढवावी लागेल. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे. पर्यावरणासोबत अर्थव्यवस्था समजणे अधिक लाभदायक असल्याचे त्यांना कळायला हवे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण कृती अकॅडमीचे माजी संचालक मनीष रंजन म्हणाले, कोविडमुळे सध्या वापरात असलेले मास्क आणि सॅनिटायझरचे नियम पालन हा आपल्या जीवनाचा भाग व्हायला हवा. आपल्या पूर्वीची पिढी चांगल्या आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पालन करण्यात कठोर होती आणि ही संस्कृती आपण विसरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपत्ती केवळ नैसर्गिक नसते तर मनुष्य निर्मितही असते. भोपाळ गॅस दुर्घटना ही औद्योगिक होती आणि आजच्या काळात अशाप्रकारे दुर्घटना घडली तर त्याची लोकसंख्येमुळे हानी अतिशय भयानक असेल. एनडीआरएफ टास्क फोर्सची स्थापना आपत्ती व्यवस्थापन करण्यासह जागृती आणि सजगता निर्माण करण्यासाठी झाली आहे. कोरोना ही सुद्धा जैविक आपत्ती असून संसर्गजन्य असल्याने मास्क वापरणे गरजेचे आहे. हा मास्क आपल्याला इतर विषाणू, जिवाणू आणि वाहन व औद्योगिक निघणाऱ्या प्रदूषणापासूनही सुरक्षित करतो. त्यामुळे त्यांचा उपयोग स्मार्टपणे आणि नियमित करणे आवश्यक आहे.

आपत्ती ही मानवाच्या नियंत्रणात नाही पण त्यासाठी तयार राहणे आपल्या हातात आहे. म्हणून पूर्व नियंत्रण राखणे समजून घेणे गरजेचे आहे. प्राथमिक सुरक्षा पालन करण्यासह प्रदूषणाचे आणि आजारांचे प्रकार, आपल्या कृतीचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्यविषयक पूर्वनियोजन कृती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत रंजन यांनी व्यक्त केले.