शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनो सत्तेची चाबी हाती घ्या : बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:41 IST

कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबहुजन समाज दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.बसपा, बामसेफ, डीएसफोरचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बसपा नागपूर विभागातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी संघटन समीक्षा व बहुजन समाज दिवस समारोह आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश प्रभारी अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर विशेष अतिथी होते.प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, कांशीराम यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. फुले-शाहू-आंबेडकर व तमाम मानवतावादी महापुरुषांचे स्वप्न साकार करणे हेच त्यांचे ध्येय व उद्दिष्ट होते. याच ध्येयाने झपाटलेल्या कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात जाऊन बसपाची सत्ता स्थापन केली. मायावतींसारखी एका दलित महिला देशाच्या सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनू शकते हे निराश व हताश झालेल्या शोषित-पीडित-बहुजन समाजाला त्यांनी दाखवून दिले. २०१९ मध्ये देखील केंद्रात बसपाची सत्ता येईल व मायावती पंतप्रधान होतील, असा विश्वाससुद्धा सुरेश साखरे यांनी व्यक्त केला.यावेळी कृष्णाजी बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रा. पी.एस. चंगोले, राजकुमार शेंडे, चेतन पवार, मंगेश ठाकरे, बाळासाहेब गावंडे, अरविंद माळी, इंजी. दादाराव उईके यांनीही कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी केले. संचालन पृथ्वीराज शेंडे यांनी केले. रुपेश बागेश्वर यांनी आभार मानले.मजबूत संघटनेशिवाय विजय अशक्यअ‍ॅड. संदीप ताजने यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. संघटना बांधणी झाली परंतु प्रामाणिकपणे संघटनेची काळजी घेतली जात नाही. अनेक पदाधिकारी केवळ कागदोपत्री आहेत. त्यांना कामाला लावण्याची गरज आहे. संघटना मजबूत नसेल तर विजय अशक्य आहे. तेव्हा संघटना मजबूत करा. संघटनेची प्रामाणिकपणे बांधणी झाल्यास किमान २० आमदार सहज निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर