शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

बहुजनांनो सत्तेची चाबी हाती घ्या : बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:41 IST

कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबहुजन समाज दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.बसपा, बामसेफ, डीएसफोरचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बसपा नागपूर विभागातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी संघटन समीक्षा व बहुजन समाज दिवस समारोह आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश प्रभारी अ‍ॅड. संदीप ताजने, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर विशेष अतिथी होते.प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, कांशीराम यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. फुले-शाहू-आंबेडकर व तमाम मानवतावादी महापुरुषांचे स्वप्न साकार करणे हेच त्यांचे ध्येय व उद्दिष्ट होते. याच ध्येयाने झपाटलेल्या कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात जाऊन बसपाची सत्ता स्थापन केली. मायावतींसारखी एका दलित महिला देशाच्या सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनू शकते हे निराश व हताश झालेल्या शोषित-पीडित-बहुजन समाजाला त्यांनी दाखवून दिले. २०१९ मध्ये देखील केंद्रात बसपाची सत्ता येईल व मायावती पंतप्रधान होतील, असा विश्वाससुद्धा सुरेश साखरे यांनी व्यक्त केला.यावेळी कृष्णाजी बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रा. पी.एस. चंगोले, राजकुमार शेंडे, चेतन पवार, मंगेश ठाकरे, बाळासाहेब गावंडे, अरविंद माळी, इंजी. दादाराव उईके यांनीही कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी केले. संचालन पृथ्वीराज शेंडे यांनी केले. रुपेश बागेश्वर यांनी आभार मानले.मजबूत संघटनेशिवाय विजय अशक्यअ‍ॅड. संदीप ताजने यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. संघटना बांधणी झाली परंतु प्रामाणिकपणे संघटनेची काळजी घेतली जात नाही. अनेक पदाधिकारी केवळ कागदोपत्री आहेत. त्यांना कामाला लावण्याची गरज आहे. संघटना मजबूत नसेल तर विजय अशक्य आहे. तेव्हा संघटना मजबूत करा. संघटनेची प्रामाणिकपणे बांधणी झाल्यास किमान २० आमदार सहज निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर