शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नागपूर मनपात मागासवर्गीयांच्या निधीची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:02 IST

आर्थिकदृष्ट्या मागास वसाहतीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मागास घटकांची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्यान निर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा मागासवर्गीयासाठी राखीव ठेवला. जातो. नियमानुसार लोकसंख्येच्या ६० टक्के मागासवर्गीयांची संख्या असलेल्या भागातच हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षात मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीची पळवापळवी सुरू आहे.

ठळक मुद्देकसा होणार दुर्बल घटकांचा विकास : मागासवर्गीय नसलेल्या वस्त्यांत खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या मागास वसाहतीतील लोकांचे जीवनमान उंचवावे यासाठी मागास घटकांची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्यान निर्मिती, पथदिवे व शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा मागासवर्गीयासाठी राखीव ठेवला. जातो. नियमानुसार लोकसंख्येच्या ६० टक्के मागासवर्गीयांची संख्या असलेल्या भागातच हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षात मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीची पळवापळवी सुरू आहे.२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ४२१ इतकी होती. यात ३९.४० टक्के लोकसंख्या दुर्बल घटकांची होती. आता शहरातील लोकसंख्येचा आकडा ३० लाखांच्या पुढे गेला आहे. म्हणजेच शहरात मागासवर्गीयांची लोकसंख्या दहा लाखाहून अधिक आहे. याचा विचार करता या भागात मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी व वजनदार नगरसेवक मागासर्गीयांचा निधी अन्य भागातील विकास कामावर खर्च करीत आहेत. विशेष म्हणजे यात काही पदाधिकाऱ्यांच्या वस्त्यांचाही समावेश आहे.मागासवर्गीयांच्या राखीव निधीतून अशा वस्त्यात भूमिगत नाल्या, रस्ते, पाणी, शौचालय, प्राथमिक व माध्यमिक शाळा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलती, उद्यान निर्मिती, समाज मंदिर, पथदिवे, दुर्बल घटकांसाठी घरकु लांचे बांधकाम अशा स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र ज्या भागात मागासवर्गीयांची संख्या कमी असलेल्या भागात हा निधी खर्च होत असल्याचा मागावर्गीय भागातील नगरसेवकांचा आरोप आहे.आर्थिक तंगीचा फटकामहापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने आयुक्तांनी विकास कामांच्या फाईल मंजुरीवर निर्बंध घातले आहे. तसेच उपलब्ध निधीनुसार मूलभूत सुविधांची कामे केली जात आहे. वास्तविक अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा दुर्बल घटकांवर खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु नियम व निकष धाब्यावर बसवून मागासवर्गीयांच्या निधीची पळवापळवी सुरू आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.मागासवर्गीयावर अन्यायमहापालिकेच्या अर्थसंकल्पात प्राप्त महसुलाच्या पाच टक्के निधी हा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवला जातो. यातून दुर्बल घटकांची लोकसंख्या ६० टक्केहून अधिक असलेल्या भागात हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु ज्या भागात दुर्बल घटकांची लोकसंख्या फारशी नाही अशा भागात हा निधी खर्च केला जात आहे. तसेच अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. परंतु हा संपूर्ण निधी खर्च केला जात नाही. हा मागासवर्गीयावर अन्याय असून याला प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केली आहे.मागील चार वर्षात दुर्बल घटकांसाठी केलेली तरतूदवर्ष              तरतूद (कोटी)२०१५-१६   ८९.३९२०१६-१७   ६०. २९२०१७-१८   २२.२६२०१८-१९   ५६.२६

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी