शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

जात पडताळणी समित्यांच्या मनमानीमुळे मागासवर्ग त्रस्त; चढावी लागते कोर्टाची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 23:00 IST

Nagpur News जातप्रमाणपत्र पडताळणी समित्या न्यायालयीन आदेश व नियमांची पायमल्ली करून जातवैधता प्रमाणपत्र नाकारत असल्यामुळे दरवर्षी शेकडो पीडित मागासवर्गीयांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देजात सिद्ध करण्यात वेळ व पैसा होतो खर्च

राकेश घानोडे

नागपूर : सर्वोच्च व उच्च न्यायालयाने वेळोवेळी समज दिल्यानंतरही राज्यातील जातप्रमाणपत्र पडताळणी समित्या मनमानी कारभार करत आहेत. समित्या न्यायालयीन आदेश व नियमांची पायमल्ली करून जातवैधता प्रमाणपत्र नाकारत असल्यामुळे दरवर्षी शेकडो पीडित मागासवर्गीयांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. या प्रक्रियेत त्यांचा वेळ व पैसा खर्च होत आहे शिवाय मनस्तापही सहन करावा लागत आहे. परिणामी, मागासवर्गीयांनीच कायदे जाणून समित्यांना भानावर आणणे गरजेचे झाले आहे.

राज्यघटनेपूर्वीचे दस्तावेज बहुमुल्य

२६ जानेवारी १९५० पासून लागू राज्यघटनेत मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विविध लाभांच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. परिणामी, राज्यघटना लागू झाल्यानंतर हे लाभ मिळविण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रवृत्ती उदयास आली. त्यामुळे, जातवैधता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी राज्यघटना लागू होण्यापूर्वीचे दस्तावेज अतिशय महत्वाचे मानले जातात. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'आनंद काटोले' प्रकरणावरील निर्णयात राज्यघटनेपूर्वीचे दस्तावेज बहुमुल्य असल्याचे आणि हे दस्तावेज खोटे असल्याचे पुरावे रेकॉर्डवर नसल्यास समित्यांनी संबंधित अर्जदाराला जातवैधता प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले आहे.

रक्तसंबंधातील वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे

आजोबा, वडील, काका, आत्या, भाऊ, बहीण, चुलतभाऊ, चुलत बहीण अशा रक्तसंबंधातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र जारी झाले असेल तर, त्या आधारावर समान रक्तसंबंधातील इतर व्यक्तींना, कुणाचा आक्षेप नसल्यास जात वैधता प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने २७ जुलै २०१० रोजी ‘अपूर्वा निचळे’ प्रकरणावर दिलेल्या निर्णयामध्ये अशा अर्जदारांच्या बाबतीत दक्षता पथकामार्फत चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. याशिवाय राज्य सरकारने यासंदर्भात २२ ऑगस्ट २००७ रोजी जीआर जारी केला आहे व २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना काढून नियम १६ (३) लागू केला आहे.

चालीरितीवर भर दिला जाऊ शकत नाही

अर्जदाराकडे स्वत:च्या जातीविषयी दस्तावेजाचे पुरावे असल्यास पडताळणी समिती चालीरिती चाचणीवर अधिक भर देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने २ सप्टेंबर १९९४ रोजी ‘माधुरी पाटील’ प्रकरणावरील निर्णयात ही बाब स्पष्ट केली आहे. काळाच्या ओघात सर्वच समाजाच्या चालीरीती बदलल्या आहेत. समाज आधुनिकतेकडे वळत आहे. परिणामी, चालीरीती चाचणीचा केवळ दस्तावेजाला आधार म्हणून विचार केला जाऊ शकतो, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

पडताळणी समित्या सुधारल्या नाही

पडताळणी समित्यांची बेकायदेशीर कृती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एप्रिल-२०१७ मध्ये 'अश्विनी चव्हाण' प्रकरणात समित्यांवर कडक ताशेरे ओढले, तसेच सप्टेंबर-२०१८ मध्ये 'श्रेयस डांगे' प्रकरणात नागपूर समितीतील चार सदस्यांवर प्रत्येक एक लाख रुपये दंड ठोठावला. याशिवाय समित्यांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जाते. परंतु, समित्या अद्याप पूर्णपणे सुधारल्या नाहीत.

 ॲड. शैलेश नारनवरे, ज्येष्ठ अधिवक्ता, हायकोर्ट.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय