शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
4
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
5
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
6
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
7
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
8
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
9
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
10
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
11
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
12
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
13
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
14
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
15
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
16
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
17
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
18
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
19
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
20
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी समित्यांच्या मनमानीमुळे मागासवर्ग त्रस्त; चढावी लागते कोर्टाची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 23:00 IST

Nagpur News जातप्रमाणपत्र पडताळणी समित्या न्यायालयीन आदेश व नियमांची पायमल्ली करून जातवैधता प्रमाणपत्र नाकारत असल्यामुळे दरवर्षी शेकडो पीडित मागासवर्गीयांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देजात सिद्ध करण्यात वेळ व पैसा होतो खर्च

राकेश घानोडे

नागपूर : सर्वोच्च व उच्च न्यायालयाने वेळोवेळी समज दिल्यानंतरही राज्यातील जातप्रमाणपत्र पडताळणी समित्या मनमानी कारभार करत आहेत. समित्या न्यायालयीन आदेश व नियमांची पायमल्ली करून जातवैधता प्रमाणपत्र नाकारत असल्यामुळे दरवर्षी शेकडो पीडित मागासवर्गीयांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. या प्रक्रियेत त्यांचा वेळ व पैसा खर्च होत आहे शिवाय मनस्तापही सहन करावा लागत आहे. परिणामी, मागासवर्गीयांनीच कायदे जाणून समित्यांना भानावर आणणे गरजेचे झाले आहे.

राज्यघटनेपूर्वीचे दस्तावेज बहुमुल्य

२६ जानेवारी १९५० पासून लागू राज्यघटनेत मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विविध लाभांच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. परिणामी, राज्यघटना लागू झाल्यानंतर हे लाभ मिळविण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रवृत्ती उदयास आली. त्यामुळे, जातवैधता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी राज्यघटना लागू होण्यापूर्वीचे दस्तावेज अतिशय महत्वाचे मानले जातात. २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'आनंद काटोले' प्रकरणावरील निर्णयात राज्यघटनेपूर्वीचे दस्तावेज बहुमुल्य असल्याचे आणि हे दस्तावेज खोटे असल्याचे पुरावे रेकॉर्डवर नसल्यास समित्यांनी संबंधित अर्जदाराला जातवैधता प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले आहे.

रक्तसंबंधातील वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे

आजोबा, वडील, काका, आत्या, भाऊ, बहीण, चुलतभाऊ, चुलत बहीण अशा रक्तसंबंधातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र जारी झाले असेल तर, त्या आधारावर समान रक्तसंबंधातील इतर व्यक्तींना, कुणाचा आक्षेप नसल्यास जात वैधता प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने २७ जुलै २०१० रोजी ‘अपूर्वा निचळे’ प्रकरणावर दिलेल्या निर्णयामध्ये अशा अर्जदारांच्या बाबतीत दक्षता पथकामार्फत चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. याशिवाय राज्य सरकारने यासंदर्भात २२ ऑगस्ट २००७ रोजी जीआर जारी केला आहे व २४ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना काढून नियम १६ (३) लागू केला आहे.

चालीरितीवर भर दिला जाऊ शकत नाही

अर्जदाराकडे स्वत:च्या जातीविषयी दस्तावेजाचे पुरावे असल्यास पडताळणी समिती चालीरिती चाचणीवर अधिक भर देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने २ सप्टेंबर १९९४ रोजी ‘माधुरी पाटील’ प्रकरणावरील निर्णयात ही बाब स्पष्ट केली आहे. काळाच्या ओघात सर्वच समाजाच्या चालीरीती बदलल्या आहेत. समाज आधुनिकतेकडे वळत आहे. परिणामी, चालीरीती चाचणीचा केवळ दस्तावेजाला आधार म्हणून विचार केला जाऊ शकतो, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

पडताळणी समित्या सुधारल्या नाही

पडताळणी समित्यांची बेकायदेशीर कृती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एप्रिल-२०१७ मध्ये 'अश्विनी चव्हाण' प्रकरणात समित्यांवर कडक ताशेरे ओढले, तसेच सप्टेंबर-२०१८ मध्ये 'श्रेयस डांगे' प्रकरणात नागपूर समितीतील चार सदस्यांवर प्रत्येक एक लाख रुपये दंड ठोठावला. याशिवाय समित्यांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जाते. परंतु, समित्या अद्याप पूर्णपणे सुधारल्या नाहीत.

 ॲड. शैलेश नारनवरे, ज्येष्ठ अधिवक्ता, हायकोर्ट.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय