शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 12:39 IST

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.

ठळक मुद्देहिंगणा, आष्टी, तिरोडा, तुमसरची स्थिती ‘जैसे थे’

योगेश पांडे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी होते. मात्र प्रत्यक्षात संबंधित वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला असता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा ‘जीईआर’ (ग्रॉन इनरोलमेन्ट रेशियो) ३९ टक्क्यांवर कायम असून त्यात वाढ झालेली नाही. ग्रामीण भागात तर विद्यार्थ्यांच्या नोंदणीचाच अनुशेष आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासाठी नोंदणी करणे अपेक्षित असते. मात्र शैक्षणिक असमतोलाचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसतो. विविध कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेशच घेत नाहीत. त्यामुळे ‘जीईआर’चे प्रमाण वाढत नाही, असे विद्यापीठ कार्यक्षेत्रात चित्र आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्याचे उच्चशिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण म्हणजेच ‘जीईआर’ हा ३९.८० टक्के आहे. मात्र अनेक विद्यार्थी हे बाहेरील विद्यापीठात शिक्षणासाठी जातात. त्यामुळे नागपूर विद्यापीठाचा प्रत्यक्ष ‘जीईआर’ हा अवघा २४.७५ टक्के इतका आहे. काही तालुक्यांमध्ये तर ‘जीईआर’चे प्रमाण अवघे १५ टक्के इतकेच आहे. येथील विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणासाठी कमी प्रमाणात होणारी नोंदणी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. हिंगणा (१३.९२ %), आष्टी (१२.५६%), तुमसर (२१.५२ टक्के) व तिरोडा (१५.२९ %) असे ‘जीईआर’चे प्रमाण आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्येदेखील हीच आकडेवारी होती. तीन वर्षांत यात काहीही सुधारणा झालेली नाही व विद्यापीठाकडूनदेखील त्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत.

नागपूर आघाडीवर तर गोंदिया जिल्हा पिछाडीवर

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे असून यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया यांचा समावेश आहे. २०२१ साली नागपूर जिल्ह्याचा ‘जीईआर’ सर्वाधिक ५५.८१ टक्के इतका होता. सर्वात कमी १५.२९ टक्के ‘जीईआर’ गोंदिया जिल्ह्याचा होता.

ग्रामीण भागात महाविद्यालयांची आवश्यकता

कमी ‘जीईआर’ असलेल्या भागांमध्ये शैक्षणिक सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेषत: ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करुन तेथे पायाभूत सविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात हिंगणा, आष्टी, तुमसर, तिरोडा येथे २०२४ पर्यंत नवीन महाविद्यालये स्थापन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातील अधिकाऱ्यांनादेखील सद्यस्थिती माहिती नाही.

‘जीईआर’ची आकडेवारी

जिल्हा - ‘जीईआर’

नागपूर -५५.८१ %

वर्धा - २९.५० %

भंडारा -२१.१९ %

गोंदिया- १५.२९ %

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी