शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अनुशेष; विद्यापीठासमोर ‘जीईआर’ वाढविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 12:39 IST

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.

ठळक मुद्देहिंगणा, आष्टी, तिरोडा, तुमसरची स्थिती ‘जैसे थे’

योगेश पांडे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी होते. मात्र प्रत्यक्षात संबंधित वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला असता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा ‘जीईआर’ (ग्रॉन इनरोलमेन्ट रेशियो) ३९ टक्क्यांवर कायम असून त्यात वाढ झालेली नाही. ग्रामीण भागात तर विद्यार्थ्यांच्या नोंदणीचाच अनुशेष आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासाठी नोंदणी करणे अपेक्षित असते. मात्र शैक्षणिक असमतोलाचा फटका विद्यार्थ्यांनादेखील बसतो. विविध कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कारणांमुळे विद्यार्थी बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेशच घेत नाहीत. त्यामुळे ‘जीईआर’चे प्रमाण वाढत नाही, असे विद्यापीठ कार्यक्षेत्रात चित्र आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्याचे उच्चशिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण म्हणजेच ‘जीईआर’ हा ३९.८० टक्के आहे. मात्र अनेक विद्यार्थी हे बाहेरील विद्यापीठात शिक्षणासाठी जातात. त्यामुळे नागपूर विद्यापीठाचा प्रत्यक्ष ‘जीईआर’ हा अवघा २४.७५ टक्के इतका आहे. काही तालुक्यांमध्ये तर ‘जीईआर’चे प्रमाण अवघे १५ टक्के इतकेच आहे. येथील विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणासाठी कमी प्रमाणात होणारी नोंदणी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. हिंगणा (१३.९२ %), आष्टी (१२.५६%), तुमसर (२१.५२ टक्के) व तिरोडा (१५.२९ %) असे ‘जीईआर’चे प्रमाण आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्येदेखील हीच आकडेवारी होती. तीन वर्षांत यात काहीही सुधारणा झालेली नाही व विद्यापीठाकडूनदेखील त्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत.

नागपूर आघाडीवर तर गोंदिया जिल्हा पिछाडीवर

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे असून यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया यांचा समावेश आहे. २०२१ साली नागपूर जिल्ह्याचा ‘जीईआर’ सर्वाधिक ५५.८१ टक्के इतका होता. सर्वात कमी १५.२९ टक्के ‘जीईआर’ गोंदिया जिल्ह्याचा होता.

ग्रामीण भागात महाविद्यालयांची आवश्यकता

कमी ‘जीईआर’ असलेल्या भागांमध्ये शैक्षणिक सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेषत: ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करुन तेथे पायाभूत सविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात हिंगणा, आष्टी, तुमसर, तिरोडा येथे २०२४ पर्यंत नवीन महाविद्यालये स्थापन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातील अधिकाऱ्यांनादेखील सद्यस्थिती माहिती नाही.

‘जीईआर’ची आकडेवारी

जिल्हा - ‘जीईआर’

नागपूर -५५.८१ %

वर्धा - २९.५० %

भंडारा -२१.१९ %

गोंदिया- १५.२९ %

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी