शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कृषी अधिकाऱ्यांचा बॅकलॉग : खरीपाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 19:40 IST

खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशात शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या कृषी विभागात पुरेसे अधिकारी नसल्याने संपूर्ण जिल्ह्याच्याच कारभाराची ‘माती’ झाल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देपेरणीच्या हंगामात अधिकाऱ्याविना मुख्यालय अन् पंचायत समित्याही रिकाम्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशात शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या कृषी विभागात पुरेसे अधिकारी नसल्याने संपूर्ण जिल्ह्याच्याच कारभाराची ‘माती’ झाल्याचे चित्र आहे़ सहा पंचायत समित्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकाऱ्यांची नऊ पदे रिक्त असल्याची आकडेवारी आहे़शासनाने ही पदे मागील काही वर्षांपासून भरली नाही़ परिणामी, जिल्हा परिषदेसह स्थानिक पंचायत समित्यांचा कृषी विभाग कसेतरी दिवस काढत आहे़ याचा फटका शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थेट लाभावर पडला आहे़ योजनांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी थांबली आहे़ खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे़ मृग नक्षत्र हे पेरणीचे नक्षत्र आहे़ त्यापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते, पेरणीपूर्व साहित्य अनुदान तत्त्वावर देण्यात येते़ अधिकारीच नसल्याने हे साहित्य कुणामार्फत वाटावे, हा प्रश्न आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचीही हीच अवस्था आहे़ येथे सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे़ आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एकाही विकास योजनांच्या फाईलला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही़रिक्त पदांचा तपशील बघितल्यास, रामटेक पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी, कळमेश्वरमध्ये कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी, उमरेड पंचायत समितीत कृषी अधिकारी, कुही येथे विस्तार अधिकारी आणि भिवापूर पंचायतमध्ये कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी तसेच कामठीमध्ये कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे़ याशिवाय, कामठीमध्ये मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे़ त्याचबरोबर जि.प.च्या मुख्यालयातील कृषी विभागात मोहीम अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) एक पद रिक्त आहे. विशेष घटक योजना अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. कनिष्ठ सहा. चे दोन पद रिक्त आहे. वरिष्ठ सहा. लेखाचे एक पद रिक्त आहे. जि.प.चे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांचा अपघात झाल्याने ते सुटीवर आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्तपदामुळे कृषीच्या योजना राबविण्यावर परिणाम होत आहे.ही शेतकऱ्यांप्रती उदासीनताच आहेहंगाम तोंडावर आहे. विभागात अधिकारी नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून एकाही विकास योजनांच्या फाईलला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही़ हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहतील. राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. अशात येथील शेतकरी हंगामाच्या तोंडावर उपेक्षित राहत असतील तर हे दुर्दैव आहे.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि.प.

 

टॅग्स :Farmerशेतकरी