शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

जिल्हास्तरीय जातपडताळीचा निर्णय मागे घ्या!

By admin | Updated: June 19, 2014 00:59 IST

शासनाने ९ जून २०१४ रोजी जिल्हास्तरीय जात पडताळणी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयान्वये फक्त महसूल विभागातील ३५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग शासनाने सुकर केलेला आहे.

नागपूर : शासनाने ९ जून २०१४ रोजी जिल्हास्तरीय जात पडताळणी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयान्वये फक्त महसूल विभागातील ३५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग शासनाने सुकर केलेला आहे. जिल्हास्तरावर समिती निर्माण करून तात्काळ अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग निर्माण केलेला नाही. त्यामुळे कामकाज शक्य नसल्याने शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंळाने पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. समाजकल्याण विभागात आधीच मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यातच शासनाने घरकूल योजना, स्वाभिमान योजना सुरू करताना नवीन कर्मचारी दिलेले नाही. सहायक आयुक्त कार्यालयात दोन पदे मंजूर असताना त्यातील तीन पदे जिल्हास्तरीय समितीला उपलब्ध करून द्यावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. परंतु कु ठलेही पद मंजूर असेल तर त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार घेता येतो. परंतु सदस्य, संशोधन अधिकारी ही पदे शासनाने मंजूर केलेली नसताना त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे सोपविला आहे. तसेच नवीन समितीच्या निर्मितीची अधिसूचना निर्गमित केलेली नाही. आदिवासी विभागात कार्यरत अधिकारी याच विभागाचे आहेत. परंतु समाजकल्याण विभागाच्या समितीत महसूल विभागाचा अधिकारी अध्यक्ष असतो. जो अधिकारी उपजिल्हाधिकारी अथवा उपविभागीय अधिकारी असताना जातीचे प्रमाणपत्र देतो तोच अधिकारी भविष्यात स्वत: निर्गमित केलेले प्रमाणपत्र अध्यक्ष म्हणून पडताळणी करतो. ही बाब न्याय विसंगत आहे.समितीच्या इतर अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल समितीचा अध्यक्ष लिहिणार आहे. त्यामुळे समितीच्या दोन सदस्यांवर अध्यक्ष प्रभुत्व गाजवेल. एखाद्याने उपजिल्हाधिकारी असताना त्याने चुकीने जातीचे प्रमाणपत्र दिले आहे व तेच प्रमाणपत्र तपासणीसाठी आले तर ते रद्द होणार नाही. कारण प्रमाणपत्र रद्द झाल्यास प्रमाणपत्र देणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचे प्रयोजन आहे. त्यामुळे समितीचा अध्यक्ष महसूल विभागाचा न ठेवता समाजकल्याण विभागाचा ठेवावा, अशी संघटनेने मागणी केली. शिष्टमंडळात विभागातील अधिकारी एम.के. झोड, एस.आर.पांडे, सुरेंद्र पवार, एम.टी.वानखेडे, एस.एल.गायकवाड आदींचा समावेश होता. निर्णय रद्द न केल्यास २३ जूनपासून काम बंद आंदोलन पुकारून अधिकारी सामूहिक रजेवर जातील. असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.(प्रतिनिधी)