शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा : ताराचंद खांडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:40 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले.

ठळक मुद्दे संविधान मुव्हमेंटचा वर्धापन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले. रिपब्लिकन मुव्हमेंट या साप्ताहिकाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दिवसभराच्या वैचारिक मंथन कार्यक्रमाचे समारोप करताना ते बोलत होते. उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी ‘गेल्या साठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीला आम्ही कोणत्या स्तरावर घेऊन आलो आहोत आणि आमची जबाबदारी काय याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत व्यक्त केली. पहिल्या सत्रात पुण्याचे धर्मराज निमसरकार, का. रा. वालदेकर, बुलडाण्याचे सुरेश साबळे, उस्मानाबादच्या अस्मिता मेश्राम, डॉ. सविता कांबळे, धम्मचारी पद्मबोधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. धम्मचारी पद्मबोधी यांनी ‘आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमके काय, आंबेडकरी चळवळीचे धयेय काय, आणि ते गाठण्यासाठी साधने कोणती, असे प्रश्न उभे करीत ध्येय स्पष्ट नसेल तर आंदोलन भरकटत जाते, आंदोलन दिशाहीन होते, याकडे लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार अरुण मोटघरे, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. राजाभाऊ टाकसाळे, अशोक सरस्वती, संजय शेंडे, प्रा. रमेश राठोड, पल्लवी जीवनतारे, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील, शितल गडलिंग, आणि प्रशांत बेले यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक संपादक नरेश वाहणे यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व शीतल गडलिंग यांनी केले. विलास भोंगाडे यांनी आभार मानले.बॉक्स..लोकशाही वाचवणे ही काळाची गरजदेशात अराजकतेचे वातावरण आहे. धर्मसत्तेचा सरकारवर अंकुश आल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. तेव्हा लोकशाही वाचवणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी इ.मो.नारनवरे यांनी यावेळी दुसऱ्या सत्रातील मुक्तचर्चेत व्यक्त केले. आर्किटेक्ट नरेंद्र शेलार यांनी प्राक्कथन केले. अस्मिता मेश्राम, सुरेश साबळे, विजय बौद्ध, पल्लवी जिवनतारे, मयूर रंगारी, प्रशांत बेले, अशोक सरस्वती, अशोक मस्के, सुधीर भगत, हरीश नागदेवे, सिद्धांत पाटील, भीमराव गणवीर आदींनी भाग घेतला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरConstitution Dayसंविधान दिन