शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

बाबासाहेबांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक

By admin | Updated: February 9, 2015 00:58 IST

आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे,

‘बाबांचे शिलेदार’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन नागपूर : आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे, अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.आंबेडकरी चळवळीतील सहकारी सत्कार मंचच्यावतीने आयोजित अ‍ॅड. हंसराज भांगे लिखित ‘बाबांचे शिलेदार’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रामगोपाल माहेश्वरी सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, आ. डॉ. मिलिंद माने, माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, डॉ. पूरण मेश्राम, समता सैनिक दलाचे प्रमुख हरीश चहांदे, बाबा हातेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील प्रमुख अतिथी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सर्व दीनदुबळे, शोषितांची चळवळ आहे. या चळवळीत ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीत कामे केले, अशा बाबांच्या शिलेदारांना समाजापुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण काम हंसराज भांगे यांनी केले आहे. हा ग्रंथ अतिशय अमूल्य असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, तेव्हा समाजकल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व वसतिगृहांमध्ये हा ग्रंथ पोहाचवण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी यावेळी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भाऊ लोखंडे यांनी सध्याचा काळ अतिशय कठीण असल्याची जाणीव करून दिली. या कठीण काळात बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणखी एकजुटीने राहण्याची गरज आहे. बाबासाहेबांना आपल्या अनुयायांपासून मोठ्या अपेक्षा होत्या. तेव्हा एकजुटीने ही चळवळ गतिमान ठेवण्याचा प्रयत्न करू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रंथाचे लेखक अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी यावेळी प्रस्ताविक व आपले मनोगत व्यक्त केले. भंते नाग दीपांकर यांनी बुद्धवंदना सादर केली. ललित खोब्रागडे यांनी संचालन केले. रामभाऊ आंबुलकर यांनी आभार मानले. गजानन आवळे, डी.एम. बेलेकर, सुधीर मेश्राम, भय्या शेलारे, सुधीर भगत, भीमराव गणवीर, नरेश मेश्राम, डी.एम. बेलेकर आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)