शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

बाबासाहेबांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक

By admin | Updated: February 9, 2015 00:58 IST

आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे,

‘बाबांचे शिलेदार’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन नागपूर : आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे, अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.आंबेडकरी चळवळीतील सहकारी सत्कार मंचच्यावतीने आयोजित अ‍ॅड. हंसराज भांगे लिखित ‘बाबांचे शिलेदार’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रामगोपाल माहेश्वरी सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, आ. डॉ. मिलिंद माने, माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, डॉ. पूरण मेश्राम, समता सैनिक दलाचे प्रमुख हरीश चहांदे, बाबा हातेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील प्रमुख अतिथी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सर्व दीनदुबळे, शोषितांची चळवळ आहे. या चळवळीत ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीत कामे केले, अशा बाबांच्या शिलेदारांना समाजापुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण काम हंसराज भांगे यांनी केले आहे. हा ग्रंथ अतिशय अमूल्य असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, तेव्हा समाजकल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व वसतिगृहांमध्ये हा ग्रंथ पोहाचवण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी यावेळी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भाऊ लोखंडे यांनी सध्याचा काळ अतिशय कठीण असल्याची जाणीव करून दिली. या कठीण काळात बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणखी एकजुटीने राहण्याची गरज आहे. बाबासाहेबांना आपल्या अनुयायांपासून मोठ्या अपेक्षा होत्या. तेव्हा एकजुटीने ही चळवळ गतिमान ठेवण्याचा प्रयत्न करू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रंथाचे लेखक अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी यावेळी प्रस्ताविक व आपले मनोगत व्यक्त केले. भंते नाग दीपांकर यांनी बुद्धवंदना सादर केली. ललित खोब्रागडे यांनी संचालन केले. रामभाऊ आंबुलकर यांनी आभार मानले. गजानन आवळे, डी.एम. बेलेकर, सुधीर मेश्राम, भय्या शेलारे, सुधीर भगत, भीमराव गणवीर, नरेश मेश्राम, डी.एम. बेलेकर आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)