शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:18 IST

Manoj Jarange Patil :बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे.  आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आरक्षणावरुन बबनराव तायवाडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही समाजाची मागणी आहे, असंही तायवाडे म्हणाले. 

शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका

"महाज्योतीला लोकसंख्येनुसार जास्तीत जात निधी द्यायला पाहिजे,युवक आणि सामान्य माणसाचे भले होईल. ओबीसी हॉस्टेल सुरू झाले नाही याचीही चर्चा व्हायला पाहिजे,बिहारमध्ये जशी जनगणना झाली तशीच जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून जातनिहाय जनगणना करण्यासाठी बाध्य करावे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले. 

जरांगे पाटलांवर टीका

"मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांवर बोलत आहेत. जरांगे खालच्या स्तरावर भाषा वापरतात. त्यांची उंची आहे का?, असा सवालही बबनराव तायवाडे यांनी केला. ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात,येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते हे आम्ही दाखवून देऊ. पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे आणि आता आमची शक्ती दाखवू, असंही तायवाडे म्हणाले. 

कुणबी नोंदीबाबत बोलताना तायवाडे म्हणाले, ५४ लाख किंवा ५७ लाखांचा आकडा सांगत आहेत, यात ५७ लाखात ९५ टक्के नोंदी जरांगे पाटील यांच्या आंदोलन आधीच्या आहेत. सरकारने श्वेत पत्र जाहीर करावे, की जरांगे यांच्या आंदोलनपूर्वी आणि आंदोलन नंतर किती नोंदी झाली,मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होते आहे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले. 

आज सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले , या ट्विटवर बोलताना तायवाडे म्हणाले, महाराष्ट्राला माहीत आहे की ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आम्ही आंदोलने करीत असतो. आमचे सर्व प्रश्न संविधानिक आणि शांततेत पूर्ण केले, आमच्या संघटनेने ४८ जीआर काढले आहेत. सरकारसोबत चर्चा करतो, मुद्दे मांडतो,अमच्याबाबतही कोणी बोलावे, ट्विट करावे, असंही तायवाडे म्हणाले.

टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण